शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

CoronaVirus भविष्याची चिंता नको; कोणालाही नोकरीतून काढणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 05:38 IST

कर्मचाऱ्यांना दिलासा; अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचा निर्णय

बंगळुरू : कोरोनाची साथ व टाळेबंदी असेपर्यंत कोणालाही सेवेतून कमी करण्यात येणार नाही, असे आश्वासन अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिले आहे. भारतातही या कंपन्यांचे ठळक अस्तित्व आहे. त्यातील काही कंपन्यांनी ९० दिवस, तर काही कंपन्यांनी यंदाच्या वर्षाच्या अखेरीपर्यंत कोणालाही नोकरीतून काढणार नाही. तसेच, नवीन भरतीचे प्रमाण कमी केले जाईल.

सॅप, मॉर्गन स्टॅनले, सेल्सफोर्स, पालो आॅल्टो नेटवर्क्स, पायपाल, सिटी ग्रुप, जेपी मॉर्गन, बँक आॅफ अमेरिका, बुझ अ‍ॅलेन हॅमिल्टन आदी कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. जेपी मॉर्गन इंडिया या कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, कोरोना साथीच्या काळात कोणालाही नोकरीवरून न काढण्याचा निर्णय आमच्या कंपनीने घेतला आहे. तसेच, काही जागांसाठी नवीन भरती केली जाणार नाही व काही ठिकाणी थोड्या प्रमाणात भरती केली जाईल. जेपी मॉर्गनचे भारतात ३४ हजार कर्मचारी आहेत. सॅप कंपनीने कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून ९० दिवसांपर्यंत कोणालाही नोकरीतून कमी न करण्याचे ठरविले आहे. या कंपनीचे भारतात १३ हजार कर्मचारी आहेत. मॉर्गन स्टॅनले या कंपनीचे सीईओ जेम्स गोर्मन यांनी म्हटले आहे की, यंदा आम्ही एकाही कर्मचाºयाला नोकरीतून कमी करणार नाही. या कंपनीचे भारतात ३,३०० कर्मचारी आहेत. सेल्सफोर्स कंपनीचे सीइओ मार्क बेनिआॅफ यांनी सांगितले, की कोरोनाची साथ पसरल्यापासून ९० दिवसांपर्यंत फारशी नोकरकपात करणार नाही. बुझ अ‍ॅलेन हॅमिल्टन कंपनीनेही १ जुलैपर्यंत कोणालाही नोकरीतून न काढण्याचा निर्णय घेतला आहे. (वृत्तसंस्था)पगार कापणार नाही : फ्लिपकार्टबंगळुरू : लॉकडाऊनमुळे देशातील सर्व व्यवहार बंद आहेत. अनेक कंपन्यांमध्ये वर्क फ्रॉम होमद्वारे काम सुरू आहे. अशातच अनेकांचे रोजगार जाण्याची भीती व्यक्त केली जात असताना फ्लिपकार्टने मात्र कोणत्याही कर्मचाºयाचा पगार कापणार नाही, तसेच कोणालाही कामावरून कमी केले जाणार नाही, असे म्हटले आहे. फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती यांनी काही मोजक्या स्टाफसोबत घेतलेल्या बैठकीत हे आश्वासन दिले आहे. तसेच फ्लिपकार्टमध्ये इंटर्नशिप करणाºया उमेदवारांचेदेखील काहीही नुकसान होऊ दिले जाणार नाही, असेही फ्लिपकार्टने म्हटले आहे. आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम असून, कुणीही घाबरण्याचे कारण नाही. आमचे प्राधान्य कर्मचाºयांच्या आरोग्याला आहे. सर्वांनी स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, असेही या बैठकीत सांगण्यात आल्याचे एका अधिकाºयाने सांगितले. कोरोनामुळे अनेक कंपन्यांमध्ये कर्मचारीकपात किंवा पगारकपात करण्याबाबत बातम्या येत आहेत, त्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याचे समजते. कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. मात्र, या काळातदेखील आपले ग्राहक सांभाळून ठेवणे, हे आपले कौशल्य आहे. ग्राहकांसोबतची आपली नाळ तुटू न देता ज्यांना जसे शक्य आहे, त्याप्रमाणे कार्यरत राहावे. त्यासाठी आॅनलाइन किंवा आॅफलाइन पद्धतीने कंपनीसोबत आपण सगळे जोडलेले राहू शकता, असेही त्यांना सांगण्यात आले आहे.कोरोनाग्रस्तांसाठी मदत निधी‘पालो आॅल्टो नेटवर्क्स’चे सीईओ निकेश अरोरा यांनी सांगितले की, कोरोना साथीच्या काळातआमच्या कंपनीतील एका कर्मचाºयाच्या नोकरीवर गदा येणार नाही. अमेरिका, तेल अविव, भारतामध्ये मिळूनया कंपनीचे सात हजार कर्मचारी आहेत. या कंपनीने कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी एक ा निधीचीस्थापना केली आहे. त्यासाठी व्यवस्थापन ४० लाख डॉलर देणार आहे.४कोरोना साथीच्या काळात कमी काम व कमी नफा असूनही अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या कर्मचाºयांना विशिष्ट मुदतीपर्यंत नोकरीतून कमी न करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसjobनोकरी