शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

coronavirus: कोरोनाकाळात देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला दिले तीन सल्ले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 11:32 IST

कोरोनाचा फैलाव सुरू होण्यापूर्वीच देशातील ऑटो, टेलिकॉम आणि एनबीएफसी आदि क्षेत्रात मंदीचे वातावरण होते. आता कोरोनामुळे लोकांच्या रोजगार आणि आर्थिक क्षमतेवरही प्रभाव पडू लागलाय.

ठळक मुद्देसरकारने लोकांचा रोजगार सुरक्षित राहील याची व्यवस्था करावी, तसेच लोकांना प्रत्यक्ष आर्थिक मदत करून त्यांची खर्च करण्याची क्षमता कायम राखावीसरकारने क्रेडीट हमी कार्यक्रमांतर्गत व्यापार आणि उद्योगांना पुरेशी रक्कम उपलब्ध करून द्यावी सरकारने फायनान्शियल सेक्टरमध्ये संस्थागत स्वायत्तता आणि प्रक्रियांतर्गत सुधारणा करावी

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गाने देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम केला आहे. सातत्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे अनेक निर्बंध कायम आहेत. तर अनेक उद्योग व्यवहार अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नसल्याने देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आलेली आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केंद्रातील मोदी सरकारला तीन महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. 

कोरोनाचा फैलाव सुरू होण्यापूर्वीच देशातील ऑटो, टेलिकॉम आणि एनबीएफसी आदि क्षेत्रात मंदीचे वातावरण होते. आता कोरोनामुळे लोकांच्या रोजगार आणि आर्थिक क्षमतेवरही प्रभाव पडू लागलाय. अशा परिस्थितीत सरकारने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी बाजारात पैसे गुंतवले आहेत, तसेच अनेक उद्योगांनाही मदत दिली आहे. मात्र देशाच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा सावरण्यासाठी सरकारने अजून मोठी पावले उचलण्याची गरज.असल्याचे डॉ. मनमोहन सिंग यांनी सांगितले. 

बीबीसीशी संवाद साधताना डॉ. सिंग यांनी केंद्र सरकारला तीन महत्त्वाचे सल्ले दिले. पहिली बाब म्हणजे सरकारने लोकांचा रोजगार सुरक्षित राहील याची व्यवस्था करावी, तसेच लोकांना प्रत्यक्ष आर्थिक मदत करून त्यांची खर्च करण्याची क्षमता कायम राखावी. दुसरी बाब म्हणजे सरकारने क्रेडीट हमी कार्यक्रमांतर्गत व्यापार आणि उद्योगांना पुरेशी रक्कम उपलब्ध करून द्यावी. तिसरी बाब म्हणजे सरकारने फायनान्शियल सेक्टरमध्ये संस्थागत स्वायत्तता आणि प्रक्रियांतर्गत सुधारणा केली पाहिजे. 

सध्याच्या परिस्थितीला मी इकॉनॉमिक डिप्रेशन म्हणणार नाही, पण देशावर दीर्घ काळापासून एक आर्थिक संकट येणे अपेक्षित होते, असेही डॉ. मनमोहन सिंग यांनी पुढे सांगितले. दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था अधिक संकटात येईल, अशी भीती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत यांनी व्यक्त केली होती. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला 

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

टॅग्स :IndiaभारतEconomyअर्थव्यवस्थाcorona virusकोरोना वायरस बातम्याManmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदी