शहरं
Join us  
Trending Stories
1
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
2
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

CoronaVirus: भारताचा विकासदर येणार एक टक्क्याच्या खाली; फिचचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 3:14 AM

दोन तिमाहींमध्ये अर्थव्यवस्थेचा होणार संकोच

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसणार असून, चालू आर्थिक वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर (जीडीपी) एक टक्क्याहून कमी (०.८ टक्के) राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मागील वर्षी हा दर ४.९ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला गेला होता.फिच या आंतरराष्ट्रीय पतमापन संस्थेने गुरुवारी आपले विविध अर्थव्यवस्थांच्या वाढीबाबतचे सुधारित अंदाज जाहीर केले. त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था दोन तिमाहींमध्ये संकोचण्याची शक्यताही वर्तविली आहे. या संकोचामुळेच वर्षभराचा विचार करता अर्थव्यवस्थेचा विकासदर ०.८ टक्के असा राहण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहींमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर हा अनुक्रमे (-) ०.२ आणि (-) ०.१ टक्के असा राहण्याचा अंदाज फिचच्या अहवालात व्यक्त झाला आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेला मोठाच फटका बसला आहे. आर्थिक वर्षाच्या नंतरच्या दोन तिमाहींमध्ये विकासदर वाढून अनुक्रमे १.४ आणि ४.४ टक्के राहण्याची आशा आहे. यामुळेच संपूर्ण वर्षाचा विकासदर हा ०.८ टक्के राहील, असेही अहवालात मांडले आहे.ग्राहकांकडून होणारा खर्च मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता असून गुंतवणुकीमध्येही कपात होण्याचा अंदाज आहे. यामुळेच भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास कमी होणार आहे. मागील वर्षी ग्राहकांनी एकूण अर्थव्यवस्थेच्या ५.५ टक्के खर्च केला होता. यावर्षी मात्र हा खर्च केवळ ०.३ टक्क्यांवर येण्याची भीती फिचने व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे गुंतवणुकीचे प्रमाण घटून ३.५ टक्के येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. पुढील वर्षामध्ये (२०२१-२२) भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ६.७ टक्के राहण्याचा अंदाजही या अहवालामध्ये व्यक्त केला आहे.जगाचा जीडीपी ३.९ टक्क्यांनी घटण्याचा अंदाजकोरोना व्हायरसचा फटका जगातील सर्वच देशांना बसणार असल्याने जागतिक अर्थव्यवस्थाही ३.९ टक्क्यांनी कमी होणार असल्याची शक्यता फिचने व्यक्त केली आहे. या संस्थेचे मुख्य आर्थिक सल्लागार ब्रायन कोल्टन यांनी सांगितले की, दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक अर्थव्यवस्थेला बसणारा हा सर्वात मोठा फटका असेल.२००८-०९ मध्ये आलेल्या जागतिक मंदीपेक्षाही यावेळी होणारे नुकसान मोठे असणार आहे. जगभरातील उभरत्या अर्थव्यवस्थांमध्येही मोठ्या प्रमाणावर घट होण्याचा अंदाजही या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आला आहे. भारत आणि चीन या दोन्ही अर्थव्यवस्थांचा विकासदर एक टक्क्याच्या खाली गेल्याने त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर कमी होण्याचा वेग वाढला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEconomyअर्थव्यवस्था