शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

'निर्दयी मोदी सरकारला गरिबांची कणव नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 1:16 AM

काँग्रेस नेते चिदम्बरम यांची टीका

नवी दिल्ली : मोदी सरकार निर्दयी असून त्यांना ‘लॉकडाऊन’मुळे देशोधडीला लागलेल्या गरिबांची जराही कणव नाही, अशी टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी रविवारी केली.टष्ट्वीटरवरून ही टीका करताना चिदम्बरम यांना पहिल्या टष्ट्वीटमध्ये लिहिले की, हाती पैसा नसल्याने अधिकाधिक लोकांना नाईलाजाने मोफत जेवण वाटपाच्या रांगांमध्ये उभे राहावे लागत आहे, ही वस्तुस्थिती भक्कम पुराव्यानिशी आता समोर येत आहे.दुसऱ्या टष्ट्वीटमध्ये त्यांनी दोन प्रश्न उपस्थित केले. सरकार या गरिबांच्या खात्यांमध्ये थेट पैसे जमा करून त्यांची उपासमार व अब्रुचे धिंडवडे निघणे का थांबवीत नाही? अन्न महामंडळाच्या गोदामांमध्ये ७.७ कोटी टन अन्नधान्याचे साठे पडून असताना त्यातील काही धान्य सरकार या लोकांचे पोट भरण्यासाठी त्यांना मोफत का देत नाही? तिसरे टष्ट्वीट थेट पंतप्रधान मोदी व वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या रोखाने करून चिदम्बरम यांनी लिहिले की, हे दोन्ही प्रश्न अर्थकारणाप्रमाणेच नैतिकतेशीही निगडित आहेत. पण मोदीव सितारामन त्यांची उत्तरे देऊ शकत नसल्याने देश हताशपणे पाहात राहिला आहे.‘लॉकडाऊन’ वाढविण्याच्या मोदी यांच्या घोषणेचे काँग्रेसने स्वागत केले असले तरी या निर्बंधांमुळे सर्वाधिक झळ पोहोचलेला समाजातील गरीब व शोषित वर्ग तसेच स्थलांतरित कामगार यांना दिलासा देण्यासाठी सरकारने आणखी मानवीय दृष्टीने पावले उचलायला हवीत, असा आग्रह हा विरोधी पक्ष करत आहे.पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी कोरोनासंबंधी पक्षाची ध्येयधोरणे ठरविण्यासाठी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली ११सदस्यीय सल्लागार गट शनिवारी नेमला आहे. चिदम्बरम त्याचे सदस्य आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीP. Chidambaramपी. चिदंबरम