शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

Coronavirus: रुग्णसंख्येत वाढ, लहान मुलांना धोकादायक; कोरोनाची चौथी लाट आली?, तज्ज्ञ म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 3:29 PM

गुरुवारी दिल्लीत कोरोनाचे ३२५ रुग्ण समोर आले होते. तर पॉझिटिव्हीटी रेट २.३९ इतका होता. शुक्रवारी ३.९५ पॉझिटिव्हीटी रेटसह ३६६ रुग्ण आढळले होते.

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून नियंत्रणात आलेला कोरोनानं पुन्हा डोकं वर काढल्याचं चित्र समोर आले आहे. राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णसंख्येत होणाऱ्या वाढीमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. रविवारी दिल्लीत ५१७ कोरोना रुग्ण आढळले. तर संक्रमणाचा दर ४.२१ टक्क्यावर पोहचला आहे. ज्या वेगाने कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतेय त्यामुळे कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र अद्याप कोरोना लाटेबाबत ठोस सांगू शकत नाही असं तज्ज्ञांचे म्हणणं आहे.

सरकारचं म्हणणं आहे की, सध्या घाबरण्याची गरज नाही. कारण हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचं प्रमाण कमी आहे. परंतु होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या संक्रमितांची संख्या वेगाने वाढण्याची शक्यता आहे. शनिवारी दिल्लीत ७७२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये होते. तीच संख्या रविवारी वाढून ९६४ इतकी झाली आहे. १ एप्रिलला होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या संक्रमितांची संख्या ३३२ इतकी होती. दिल्लीत कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे.

गुरुवारी दिल्लीत कोरोनाचे ३२५ रुग्ण समोर आले होते. तर पॉझिटिव्हीटी रेट २.३९ इतका होता. शुक्रवारी ३.९५ पॉझिटिव्हीटी रेटसह ३६६ रुग्ण आढळले होते. शनिवारी पॉझिटिव्हीटी रेट ५.३३ टक्के होता तर रुग्णसंख्या ४६१ झाली होती. तर रविवारी संक्रमण दरात घट झाली परंतु नवीन संक्रमित रुग्णांमध्ये ५० हून अधिक वाढ झाल्याचं दिसून आले. कोरोना चाचण्या इतक्या जास्त प्रमाणात होत नाही. रविवारी १२ हजार २७० कोविड चाचणी झाली. शनिवारी ८ हजार ६४६ चाचणी करण्यात आली. इतक्या कमी चाचणीत संक्रमणाचा दर ५ टक्क्यांपर्यंत पोहचणे चिंतेची बाब आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार ५ टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हीटी रेट चिंताजनक आहे.

लहान मुलांना धोका वाढला

दिल्ली आणि लगतच्या एनसीआर भागातील अनेक शाळांमध्ये मुलांना संसर्ग झाल्याची प्रकरणेही समोर येऊ लागली आहेत. शाळांमध्ये मुलांना संसर्ग झाल्याचे आढळल्यावर दिल्ली सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. गौतम बुद्ध नगर आणि गाझियाबादमध्येही अनेक शाळांमध्ये मुलांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. मात्र, सध्या काळजी करण्यासारखे काही नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, घाबरण्याचे काही कारण नाही, मागील लाटेंमधील आकडेवारी पाहता असे दिसून येते की जरी मुलांना संसर्ग झाला तरी त्यांच्यात अतिशय सौम्य लक्षणे असतात आणि त्यांच्यावर लवकर उपचार केले जातात.

रुग्ण वाढण्याचं कारण काय?

ओमायक्रॉनमुळे आलेली तिसरी लाट जवळजवळ थांबली होती, परंतु आता पुन्हा एकदा संक्रमित लोकांची संख्या वाढू लागली आहे. रूग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत नसली तरी होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पण याचे कारण काय? त्यावर तज्ज्ञ म्हणतात, तिसऱ्या लाटेनंतर संसर्ग कमी झाल्यानंतर सर्व निर्बंध उठवण्यात आल्याचे सांगितले आहे. दिल्लीतही मास्क घालण्याची सक्ती रद्द करण्यात आली आहे. लोकांचा बेफिकीरपणाही वाढला होता. या सर्व कारणांमुळे संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या