शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Coronavirus: देशातील दैनंदिन रुग्णवाढ पुन्हा लाखाच्या आत, पण मृतांच्या संख्येने केले सर्व रेकॉर्ड ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 10:15 IST

Coronavirus in India: गेल्या २४ तासांमध्ये देशात पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णवाढीची संख्या ही एक लाखाच्या आतच राहिली आहे. मात्र याच दिवसभरात मृतांच्या संख्येत झालेल्या विक्रमी वाढीमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

नवी दिल्ली - मार्च ते मे या तीन महिन्यांच्या काळात देशात धुमाकूळ घालणारी कोरोनाची दुसरी लाट आता बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. (Coronavirus in India) गेल्या २४ तासांमध्ये देशात पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णवाढीची संख्या ही एक लाखाच्या आतच राहिली आहे. मात्र याच दिवसभरात मृतांच्या संख्येत झालेल्या विक्रमी वाढीमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. (India reports 94,052 new Covid-19 cases, 1,51,367 discharges & 6148 deaths  in last 24 hrs)

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशामध्ये कोरोनाचे ९४ हजार ०५२ नवे रुग्ण सापडले आहेत. मात्र काल दिवसभरात देशात तब्बल सहा हजार १४८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे. एका दिवसात झालेली सहा हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद ही कोरोनाच्या संसर्गास सुरुवात झाल्यापासूनची एका दिवसातील सर्वांधिक मृत्यूंची नोंद आहे.  गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबळींची दैनंदिन संख्या सातत्याने घटत होती. गेले काही दिवस तर हा आकडा तीन हजारांच्याही खाली आला होता. मात्र काल एका दिवसांत झालेल्या सहा हजारांहून अधिक कोरोनाबळींच्या नोंदीमुळे चिंता वाढण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, गेल्या २४ तासांतील ९४ हजार ०५२ रुग्णांच्या वाढीमुळे देशातील एकूण रुग्णसंख्या ही २ कोटी ९१ लाख ८३ हजार १२१ एवढी झाली आहे. तर काल दिवसभरात झालेल्या ६ हजार १४८ मृत्यूंमुळे देशातील आतापर्यंतच्या कोरोनाबळींचा आकडा ३ लाख ५९ हजार ६७६ वर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशातील कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत असून, काल १ लाख ५१ हजार ३६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली त्यामुळे देशातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २ कोटी ७६ लाख ५५ हजार ४९३ एवढी झाली आहे. 

देशात सध्या ११ लाख ६७ हजार ९५२ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तर देशातील लसीकरणाचा वेगही वाढत असून, आतापर्यंत २३ कोटी ९० लाख ५८ हजार ३६० जणांना कोरोनावरील लसीचा डोस देण्यात आला आहे. 

दरम्यान, एका दिवसांत सर्वाधिक मृत्यूंची नोंद होण्यामागे बिहारमध्ये आरोग्य विभागाने कोरोनाबळींच्या संख्येत आधीच्या मृत्यूंची भर घालून केलेली वाढ हे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. बिहारमध्ये कोरोनाबळींच्या आकडेवारीत करण्यात आलेल्या सुधारणेमुळे राज्यातील कोरोनाबळींची संख्या ५ हजार ४५८ वरून थेट ९ हजार ४२९ वर पोहोचली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत