शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

Coronavirus: जिंकलंस भावा... गरिब अन् मजूरांची भूक भागवण्याठी दोन भावंडांनी चक्क जमीनच विकली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 8:45 AM

लॉकडाऊन सुरु होऊन आता १ महिन्याचा कालावधी उलटला असून ३ मेपर्यंत हा लॉकडाऊन राहणार आहे. मात्र, यापुढेही अजून सरकारचा काय निर्णय होईल, कुणालाही सांगता येत नाही.

ठळक मुद्देकर्नाटकमध्ये दोन भावांनी चक्क आपली जमीन विकून गरिबांना मदत केलीय. 

बंगळुरू - कोरोनाच्या संकटामुळे पैशासाठी आणि पैशामागे धावणारा माणूस आज घरात बसून आहे. कोट्याधीश, अब्जाधीश असतानाही या महामारीचा सामना त्याला घरातच बसून करावा लागत आहे. घरात धान्य नसलेल्या गरिबांनाही अन् अब्जाधीश असलेल्या उद्योजकांनाही कोरोनामुळे घराबाहेर पडता येत नाही. केवळ घरात राहणे आणि कोरोनाला दूर पळवणे हाच सर्वसाधारण इलाज या महारोगावर आहे. त्यामुळे, सर्वचजण आपल्या गावी, अन् घरात बसून स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घेत आहेत. मात्र, गरिब आणि हातावर पोट असलेल्या नागरिकांना या लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. कित्येकांना दैनंदिन अन्नासाठी हात पसरावे लागत असून त्यांची उपासमार होत आहे. त्यातच, या संकटाने माणसाला माणूसपण चागंलच शिकवलंय. या गरजूंच्या मदतीसाठी कित्येक हात पुढे आले आहेत. कर्नाटकमध्ये दोन भावांनी चक्क आपली जमीन विकून गरिबांना मदत केलीय. 

लॉकडाऊन सुरु होऊन आता १ महिन्याचा कालावधी उलटला असून ३ मेपर्यंत हा लॉकडाऊन राहणार आहे. मात्र, यापुढेही अजून सरकारचा काय निर्णय होईल, कुणालाही सांगता येत नाही. त्यामुळे, गरिब, मजूर आणि हाताव पोट असलेल्या नागरिकांमध्ये भीती अन् काळजीचं वातावरण आहे. हाताला काम नाही, घरात धान्य नाही मग खायचं काय अन् जगायचं कसं? हा मोठा प्रश्न या नागरिकांसमोर आ वासून उभा आहे. मात्र, सजाजातील दानशूर व्यक्ती, संस्था आणि संघटना पुढे येत असून अन्नदानाचे काम करत आहेत. गरिबांच्या घरी धान्य पोहोचविण्याचं काम सुरुय. कर्नाटकमधील दोन शेतकरी भावांनी चक्क आपली जमीनच विकली आहे. शहरात घेतलेला प्लॉट विकून गरिबांना मदतीचा हात या भावांनी दिला आहे. 

कर्नाटकच्या कोलार शहरात तजामुल आणि मुजम्मिल पाशा या दोन भावांनी गरीबांना धान्य देण्यासाठी, त्यांच पोट भरण्यासाठी स्वत:च्या मालकिची जमीनच विकली आहे. भावा भावांनी जमीन विकून 25 लाख रुपये उभा केले. त्यानंतर एका नेटवर्कच्या मदतीने धान्य आणि भाज्या एकत्र केल्या. त्यानंतर धान्याची पाकिटं तयार केली. ज्यामध्ये दहा किलो तांदूळ, एक किलो आटा, 2 किलो गहू, 1 किलो साखर, तेल, चहापूड, सॅनिटायझर आणि मास्क अशा स्वरुपाचं किराणा कीट पुरविण्यात आलं. हे साहित्य वाटपासाठी त्यांनी घराजवळच एक तंबू उभारला आहे. तर, शेजारीत एक कम्युनिटी किचन सुरु केलंय. या किचनच्या माध्यमातून ज्यांना घरी अन्न शिजवणं शक्य नाही, अशांना पोटभर जेवण देण्यात येत आहे. आत्तापर्यंत २८०० कुटुंबातील १२ हजार लोकांनी यांनी मदत केली आहे. 

हे दोन भावंड लहान असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. त्यावेळी, आजीसोबत ते कोलार येथे आले, आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची असल्याने शिक्षणही घेता आले नाही. लहानपणी एका मुस्लीम व्यक्तीने मशिदीजवळ घर दिले, सर्वच धर्मीयांनी आम्हाला मदत केली. कुणीही आमची जात वा धर्म पाहिला नाही, त्यावेळी आम्हाला भाकरीची किंमत कळाली होती, म्हणून आम्हीही माणसूकी जपत आपल कर्तव्य बजावत असल्याचं तजामुलने म्हटले. या दोन भावांच्या दर्यादीलपणाची चर्चा सध्या कोलार शहरात आणि बंगळोरमध्ये होत आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याLabourकामगारfoodअन्नBengaluruबेंगळूर