शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
2
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
3
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
4
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
5
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
6
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने
7
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
8
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

CoronaVirus: केंद्राच्या आक्षेपानंतर केरळने शिथिलीकरण नियम बदलले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 12:46 AM

नियमांना केंद्र सरकारने आक्षेप घेतल्यानंतर केरळ सरकारने केंद्राच्या मार्गदर्शिकेनुरूप फेरबदल केले.

नवी दिल्ली : कोरोना साथीचा प्रसार बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आलेल्या १४ पैकी सात जिल्ह्यांमध्ये ‘लॉकडाऊन’चे निर्बंध सोमवारपासून शिथिल करण्यासाठी केलेल्या नियमांना केंद्र सरकारने आक्षेप घेतल्यानंतर केरळ सरकारने केंद्राच्या मार्गदर्शिकेनुरूप फेरबदल केले.आधी केलेल्या नियमांनुसार शिथिलीकरण सोमवारी सकाळी लागू होताच केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी केरळचे मुख्यमंत्री यांना पत्र लिहून राज्याने केलेले नियम केंद्र सरकारने ५ एप्रिल रोजी जारी केलेल्या मार्गदर्शिकेचे अनेक बाबतींत उल्लंघन करणारे असल्याचा आक्षेप घेऊन शिथिलीकरणाच्या जास्तीच्या बाबी तात्काळ रद्द कराव्यात, असे सुचविले.केंद्राने ज्यास आक्षेप घेतला होता त्यात आंतरजिल्हा प्रवासास परवानगी देणे, सम व विषम नंबर प्लेटच्या खासगी वाहनांना एक दिवसाआड परवानगी देणे, दुचाकी वाहनावर मागील सीटवर बसून प्रवास करू देणे, उपाहारगृहे, केशकर्तनालये, इलेक्ट्रिक वस्तूंच्या दुरुस्तीची दुकाने पुन्हा सुरू करणे अशा बाबींचा समावेश असल्याचे समजते.काही भागांमध्ये निर्बंध शिथिल करून केरळ जनजीवन पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने आजपासून पाऊल टाकत आहे. अजूनही धोका पूर्णपणे टळलेला नसल्याने नागरिकांनी सावध राहण्याची व सर्व सुरक्षा उपाय पाळणे गरजेचे आहे.-पिनराय विजयन, मुख्यमंत्री केरळ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या