शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
3
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
4
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
5
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
6
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
7
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
8
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
9
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
10
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
11
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
12
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
13
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार
14
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
15
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
16
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
17
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
18
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
19
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
20
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!

CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! कोरोनाच्या संकटात आनंदाची बातमी; गेल्या 24 तासांत 913 नवे रुग्ण; 715 दिवसांतील नीचांक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2022 10:13 AM

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे.

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. 715 दिवसांतील नीचांक आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. 

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 913 नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तब्बल चार कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. सोमवारी (4 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 913 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 5,21,358 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशाचा रिकव्हरी रेट देखील चांगला आहे.

कोरोनाचा वेग मंदावला! राज्यांचे निर्बंध हटवण्याची घाई; तज्ज्ञांनी दिला 'हा' इशारा, म्हणाले...

देशात कोविड-19 प्रकरणांमध्ये सातत्याने घट होत असताना कोरोना निर्बंध शिथील केले जात असताना, तज्ञांनी इशारा दिला आहे. कोरोना निर्बंध पूर्णपणे हटवणं खूप घाईचं असू शकतं. लोकांनी मास्कचा वापर करावा असं त्यांनी म्हटलं आहे. याच्या मदतीने कोरोना व्हायरस, इन्फ्लूएन्झा आणि स्वाइन फ्लूसारखे इतर संसर्ग टाळता येऊ शकतात. देशातील प्रसिद्ध वायरोलॉजिस्ट टी जेकब जॉन यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील साथीचा रोग संपला असल्याने, SARS-CoV-2 चे संक्रमण कमी करण्यासाठी मास्क वापरण्याची गरज नाही. पण सार्वजनिक ठिकाणी ऐच्छिक मास्क परिधान करण्यास करणं ही चांगली कल्पना आहे. कोरोनाच्या संकटात मास्क अत्यंत प्रभावी ठरत असल्याचं याआधी समोर आलं आहे. 

डॉ रविशेखर झा यांनी मास्क घालणे अनिवार्य असले पाहिजे आणि ही सवय कायम ठेवली पाहिजे. कोरोना नियम आणि मास्क पूर्णपणे सोडून देणे योग्य नाही. जगभरात अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आधुनिक जगाने यापूर्वी अशी महामारी पाहिली नव्हती. कोरोना महामारीचे युग विसरता कामा नये. हे खरे आहे की भारतात वेगाने लसीकरण केले गेले आहे, परंतु ही लस संसर्गापासून संरक्षण देत नाही. संसर्ग प्राणघातक असू शकत नाही, परंतु यामुळे अनेक महिने अशक्तपणा येऊ शकतो असं म्हटलं आहे. कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही. त्यामुळे निष्काळजीपणा अत्यंत घातक ठरू शकतो.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCorona vaccineकोरोनाची लस