शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

LockdownNews: राहुल गांधींनी घेतली स्थलांतरित मजुरांची भेट, रस्त्यावर बसूनच साधला संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 20:30 IST

या मजुरांपैकी एक, देवेंद्र म्हणाले, राहुल गांधी अर्ध्या तासांपूर्वी अम्हाला भेटले. आम्ही हरियाणातून चालत आलो आहोत. त्यांनी आम्हाला गाडी उपल्बध करून दिली. ते म्हणाले, ही गाडी आम्हाला आमच्या घरापर्यंत सोडेल. यावेळी त्यांनी आम्हाला भोजन, पाणी आणि मास्कदेखील दिले.

ठळक मुद्देकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी घेतली स्थलांतरित मजुरांची भेट.राहुल गांधींनी मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी गाडी उपलब्ध करून दिली.तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी मजुरांना कर्ज देणारे पॅकेज नको, खिशात पैसा द्या, असा सल्लाही दिला आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात 25 मार्चपासून लॉकडाउन सुरू आहे. यामुळे शहरी भागांत राहणारे स्थलांतरित मजूर अेनेक संकटांचा आणि समस्यांचा सामना करत आपापल्या गावी परतत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी सुखदेव विहार उड्डानपुलावरून आपापल्या राज्यांत जाण्यासाठी निघालेल्या अशाच काही मजुरांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, या मजुरांच्या समस्या समजून घेतल्या. 

या मजुरांपैकी एक, देवेंद्र म्हणाले, राहुल गांधी अर्ध्या तासांपूर्वी अम्हाला भेटले. आम्ही हरियाणातून चालत आलो आहोत. त्यांनी आम्हाला गाडी उपल्बध करून दिली. ते म्हणाले, ही गाडी आम्हाला आमच्या घरापर्यंत सोडेल. यावेळी त्यांनी आम्हाला भोजन, पाणी आणि मास्कदेखील दिले.

आणखी वाचा - आनंदाची बातमी! : कोरोनावरील औषध सापडलं; 'ही' अँटीबॉडी 100 टक्के गुणकारी, अमेरिकन कंपनीचा दावा

राहुल गांधी मोदी सरकारला घेरण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. लॉकडाउन काळातही त्यांनी सरकारच्या अनेक निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले आहे. स्थलांतरीत मजुरांच्या मुद्द्यावरून तर ते प्रामुख्याने सरकार निशाणा साधत आहेत. 

आणखी वाचा - धक्कादायक! कोरोना बरे झाल्यानंतरही सोडत नाही पिच्छा; चीनमधील डॉक्टरांनी दिला 'गंभीर' इशारा

मजुरांना कर्ज देणारं पॅकेज नको, खिशात पैसा द्या,तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी एका पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर हल्ला चढवत, लॉकडाऊनमध्ये शेतकरी, मजुरांचे हाल होत आहेत, त्यांना कर्ज देणारे पॅकेज नको, त्यांच्या खिशात पैसा द्यायला हवेत. लोक रस्त्यावर तहान-भुकेने चालत आहेत, त्यांना दिलासा देण्याची गरज आहे, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी यांनी म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय रेटिंगची काळजी करू नका -शेतकरी, मजुरांनी हा देश उभा केला आहे, त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. भारताच्या आंतरराष्ट्रीय रेटिंगची काळजी करू नका. ते रेटिंग नंतरही सुधारू शकेल. सध्या देशात मजूर आणि शेतकऱ्यांचा विषय काळजीचा आहे. ते सध्या संकटात आहेत, त्यांना आधार द्या, रेटिंग आपोआप सुधारेल, असा टोलाही त्यांनी मोदी सरकारला लगावला आहे.

आणखी वाचा - आनंदाची बातमी : 'उवा' मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'या' औषधाने काही तासांतच केला कोरोनाचा 'खात्मा'!; क्लिनिकल ट्रायल सुरू

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीdelhiदिल्लीLabourकामगार