शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

CoronaVirus : "...तोपर्यंत कुणालाही असहाय्य वाटू नये", लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 16:30 IST

CoronaVirus: कोरोनावर मात करण्यासाठी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे.

ठळक मुद्देजगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजला आहे. भारतात सुद्धा कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.कोरोनावर मात करण्यासाठी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे.

कोलकाता : जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजला आहे. भारतात सुद्धा कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक राज्यात अडकलेल्या बंगालींना घरी परतण्याचे आश्वासन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले आहे. सोमवारी ममता बॅनर्जी यांनी भावूक ट्विट करत म्हटले आहे की, परराज्यात अकडलेल्या बंगाली नागरिकांच्या परतीसाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. त्यामुळे पश्चिम बंगालच्या बाहेर अडकलेल्या लाखो नागरिकांना घरी परतण्याची आशा आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ट्विट करत म्हणाल्या की, "कोरोना संकटाच्या काळात आम्ही  राज्यातील जनतेसोबत आहेत. लॉकडाऊनमध्ये राज्याबाहेर देशातील वेगवेगळ्या भागात अडकलेल्या नागरिकांची मदत करण्यासाठी बंगाल सरकार शक्य ती मदत करण्यास तयार आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या आहेत."

याचबरोबर, ममता बॅनर्जी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "मी इथे आहे, तोपर्यंत बंगालमधील कोणत्याही व्यक्तीला असहाय्य  वाटू नये. संकटाच्या या काळात मी तुमच्याबरोबर आहे. मी वैयक्तिकरित्या या प्रकरणाकडे लक्ष देत आहे आणि सर्वांना शक्य ती मदत करण्यास आम्ही कसलीही कसर सोडणार नाही. यासाठी प्रयत्न सुद्धा सुरु केले आहेत." तसेच, राजस्थानच्या कोटामध्ये अडकलेल्या बंगालमधील सर्व विद्यार्थ्यांना लवकरच परत आणले जाईल, असे आश्वासनही ममता बॅनर्जी यांनी दिले आहे.

दरम्यान, लॉकडाऊनमुळे बाहेर राज्यात अडकलेल्या लोकांना आपल्या राज्यात परत आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने पुढाकार घेतला आहे. कोट्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने राजस्थानला बसेस पाठविल्या. सर्व विद्यार्थी सुखरूप राज्यात परत आणले. त्याचबरोबर, महाराष्ट्रातील नांदेडमध्ये अडकलेल्या ३८०० शीख यात्रेकरूंना परत आणण्यासाठी पंजाब सरकार सुद्धा प्रयत्न करत आहे. १०० शीखांची पहिली तुकडीही महाराष्ट्रातून रवाना झाली आहे. याशिवाय, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी महाराष्ट्रात अडकलेल्या आपल्या राज्यातील लोकांना परत पाठविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जी