शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

CoronaVirus News: कोरोना जाणार नाही, त्याच्यासोबतच जगणं शिकावं लागेल, केजरीवालांनी सांगितला अॅक्शन प्लॅन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 22:08 IST

नवी दिल्ली : लॉकडाउन हा कोरोना व्हायरसवरील पर्याय नाही. यामुळे कोरोनाचा केवळ प्रसार थांबेल. आम्ही केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र ...

ठळक मुद्देकेजरीवाल म्हणाले लॉकडाउनमुळे केवळ कोरोनाचा प्रसार थांबेलकेजरीवालांनी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केलेयावेळी केजरीवालांनी अॅक्शन प्लॅनही सांगितला

नवी दिल्ली : लॉकडाउन हा कोरोना व्हायरसवरील पर्याय नाही. यामुळे कोरोनाचा केवळ प्रसार थांबेल. आम्ही केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो, की त्यांनी वेळेत लॉकडाउनची घोषणा केली. या काळात आम्ही कोविड हेल्थ सेंटर तयार केले, पीपीई किट आणि टेस्ट किट जमवल्या. मात्र, आता आपल्याला कोरोनासोबतच जगायची सवय लावावी लागेल. आम्ही लोक पूर्णपणे तयार आहोत, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. ते एका वृत्त वाहिनीशी बोलत होते.

केजरीवालांनी सांगितला अॅक्शन प्लॅन -यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपला अॅक्शन प्लॅनही सांगितला. यावेळी त्यांनी एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, लॉकडाउन केल्याने देश कोरोनामुक्त होणार नाही. आपण विचार करत असाल, की एखाद्या भागात लॉकडाउन केले, तर तेथील कोरोना बाधितांची संख्या शून्य होईल, तर असे जगात कुठेही होत नाहीये. आपण संपूर्ण दिल्लीलासुद्धा लॉकडाउन केले, तरी कोरोना केसेस संपणार नाहीत. लॉकडाउनमुळे कोरोना केवळ कमी होऊ शकतो.

हिंदूंनी आपले सण घरात साजरे केले, मग रमझानसाठी रस्त्यावर येण्याची सूट का?; राज ठाकरेंचा सवाल

कोरोनासोबतच जगावे लागेल - केजरीवाल म्हणाले, आता अर्थव्यवस्था खुली करण्याची वेळ आली आहे. आता दिल्ली पूर्णपणे तयार आहे. लॉकडाउननंतर कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली तरी त्यासाठी आपण तयार रहायला हवे. केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला तयारी करायला सांगावी आणि हळू-हळू राज्यांतील लॉकडाउन हटवावे. जे रेड झोन आहेत केवळ तेच बंद ठेवायला हवेत. इतर भाग खुले करायला हवेत. अशात लोकांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

CoronaVirus, LockdownNews : सरकार दुसऱ्यांदा आर्थिक पॅकेज जाहीर करण्याच्या तयारीत, मोदींची अर्थमंत्री सीतारमण यांच्याशी चर्चा

तीन कंटेनमेंट झोनमध्ये 60 टक्के मृत्यू -मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, दिल्लीतील केवळ तीन कंटेनमेंट झोनमध्ये 60 टक्के मृत्यू झाले आहेत. मरकजमधून 3200 लोक काढण्यात आले. त्यापैकी 1100 लोक कोरोनाग्रस्त सापडले. 700 ते 800 परदेशातून आलेल्या लोकांमध्ये कोरोनाची पुष्टी झाली. दिल्लीने बरेच कंट्रोल केले आहे. 

CoronaVirus, LockdownNews: छोट्या व्यवसायिकांना मोठा दिलासा, सरकारच्या आदेशानंतर 'ही' बँक देत आहे उधार पैसे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकारAam Admi partyआम आदमी पार्टी