शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

CoronaVirus News: 20 लाख कोटी नव्हे, केवळ 3.22 लाख कोटी रुपयांचेच पॅकेज, काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 20:24 IST

'पंतप्रधानांच्या घोषणेवर आक्षेप घेत, मी अर्थमंत्र्यांना प्रश्न विचारतो आणि सरकारलाही चॅलेन्ज देतो, की त्यांनी मी देत असलेल्या आकड्यांचे खंडन करावे. मी अर्थमंत्र्यांसोबत चर्चेलाही तयार आहे. अर्थमंत्र्यांनी प्रश्नांची उत्तरे द्यायलाच हवीत,' असे शर्मा म्हणाले.

ठळक मुद्देदेशातील खराब आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारकडे कुठल्याही प्रकारचा रोडमॅप नाही - आनंद शर्माशर्मा म्हणाले, 'केंद्र सरकारने जारी केलेले हे आर्थिक पॅकेज खऱ्या अर्थाने लोन आहेहे पॅकेज केवळ 3.22 लाख कोटी रुपयांचे आहे. जे जीडीपीच्या केवळ 1.6 टक्के आहे.

नवी दिल्ली : कोरोना महामारीतून देशाला सावरण्यासाठी केंद्र सरकारने 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवार या आर्थिक पॅकेजच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्प्याची घोषणा केली. यानंतर काँग्रेसचे वरिष्‍ठ नेते आनंद शर्मा यांनी नाराजी व्यक्त करत, देशातील खराब आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारकडे कुठल्याही प्रकारचा रोडमॅप नाही, असे म्हटले आहे.

आणखी वाचा - CoronaVirus News : आनंदाची बातमी! पुण्यातील फार्मा कंपनीचा दावा; कोरोनाच्या उपचारात रामबाण ठरतील 'तीन' औषधे

शर्मा म्हणाले, 'केंद्र सरकारने जारी केलेले हे आर्थिक पॅकेज खऱ्या अर्थाने लोन आहे. याला प्रोत्साहन पॅकेज म्हटले जाऊ शकत नाही. तसेच काँग्रेसने पुन्हा एकदा दावा केला, की केंद्राने जाहीर केलेल्या या पॅकेजमध्ये देशातील मजूर आणि शहरातील गरीब जनतेसाठी काहीही नाही. पंतप्रधान मोदींनी घोषित केलेल्या 20 लाख कोटी रुपायांच्या विशेष पॅकेजवर हल्ला करत आनंद शर्मा म्हणाले, हे पॅकेज केवळ 3.22 लाख कोटी रुपयांचे आहे. जे जीडीपीच्या केवळ 1.6 टक्के आहे.

आणखी वाचा -CoronaVirus News: WHOमध्ये भारताला मोठे पद; चीनवर निशाणा, भारतावर सर्वांच्या नजरा

अर्थमंत्र्यांना चॅलेन्ज -'पंतप्रधानांच्या घोषणेवर आक्षेप घेत, मी अर्थमंत्र्यांना प्रश्न विचारतो आणि सरकारलाही चॅलेन्ज देतो, की त्यांनी मी देत असलेल्या आकड्यांचे खंडन करावे. मी अर्थमंत्र्यांसोबत चर्चेलाही तयार आहे. अर्थमंत्र्यांनी प्रश्नांची उत्तरे द्यायलाच हवीत,' असे शर्मा म्हणाले.

स्थलांतरित मजुरांवर उपस्थित केला प्रश्न -सरकारच्या नियोजनातील आभावामुळे, रस्त्यावर पायी चालत असलेल्या स्थलांतरित मजुरांसंदर्भातही सरकारने देशाला उत्तर द्यायला हवे. एवढेच नाही, तर देशाला अर्थमंत्र्यांकडून गांभीर्याची अपेक्षा आहे, असेही शर्मा म्हणाले.

आणखी वाचा - CoronaVirus News : एका तासात 250 जणांची कोरोना तपासणी, टेस्टिंग किटपेक्षाही वेगवान श्वान!

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी साधला होता काँग्रेसवर निशाणा -यापूर्वी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग पाचव्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजची माहिती दिली. यावेळी काँग्रेसला लक्ष्य करत त्यांनी, स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावर एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी यावरून राजकारण करू नये, अशी मी हात जोडून विनंती करते, असे म्हटले होते.

आणखी वाचा - CoronaVirus News : आनंदाची बातमी! : कोरोनावरील औषध सापडलं; 'ही' अँटीबॉडी 100 टक्के गुणकारी, अमेरिकन कंपनीचा दावा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीBJPभाजपा