शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

CoronaVirus News: कोरोनाचा कहर वाढला; 'हे' 25 जिल्हे ठरतायत देशाची डोकेदुखी, महाराष्ट्रातील तब्बल 6 जिल्ह्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 13:45 IST

हे जिल्हे महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगाणा आणि तमिळनाडू राज्यांतील आहेत. या जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. 

ठळक मुद्देहे जिल्हे महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगाणा आणि तमिळनाडू राज्यांतील आहेत. भारतातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा दर 22 मेरोजी 4.6 टक्क्यांवर पोहोचला.देशात सर्वाधिक कोरोना बाधित मुंबईमध्ये आहेत. येथे एकूण 27,000 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

नवी दिल्ली : देशात 18 मेपासून लॉकडाउन-4ला सुरूवात झाली आहे. यात देशात लागू करण्यात आलेले अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, यानंतर देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होऊ लागली आहे. केंद्र सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार, तब्बल 25 शहरी जिल्हे देशाची डोकेदुखी वाढवत आहेत. 

हे जिल्हे महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगाणा आणि तमिळनाडू राज्यांतील आहेत. या जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. 

जाणून घ्या; पॉझिटिव्ह रुग्णांपासून 'किती ते किती दिवसांपर्यंत' पसरतो कोरोना? संशोधनाचा मोठा दावा

पॉझिटिव्ह रुग्णांचा दर 4.6 टक्क्यांवर -भारतातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा दर 22 मेरोजी 4.6 टक्क्यांवर पोहोचला. यापूर्वी तो 4.2 ते 4.3 टक्क्यांच्या दरम्यान होता. या 25 जिल्यांमध्ये 16 मेरोजी पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचा दर 8 ते 41 टक्के होता. मात्र, 22 मेरोजी तो 11 ते 52 टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे संपूर्ण देशातील दिवसाचा कोरोना पॉझिटिव्ह दर 16 मेपासून 22 मेदरम्यान 6 टक्क्यांच्या जवळपास राहिला. परिणामी देशाचा दर 4.6 टक्क्यांवर पोहोचला.

योगींचा शिवसेनेवर पलटवार, म्हणाले- महाराष्ट्र सरकारनं 'सावत्र आई' होऊन मजुरांना आश्रय दिला असता तर...

हे आहेत महाराष्ट्रातील 6 जिल्हे -या 25 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, नाशिक, मुंबई सबअर्बन, पालघर आणि रायगड या 6 जिल्ह्यांचा समावेश आहे. मुंबई जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे, 22 मेरोजी येथील पॉझिटिव्ह दर 31 टक्के होता. जो, 16 मेरोजी 41 टक्के होता. पालघर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह दर 22 मरोजी वाढून 42 टक्के झाला आहे. नाशकात तो 5 टक्के, तर रायगडमध्ये 13 टक्के आहे. देशात सर्वाधिक कोरोना बाधित मुंबईमध्ये आहेत. येथे एकूण 27,000 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  

CoronaVirus News: संपूर्ण जग वाट बघतय; पण, ऑक्सफर्डच्या वैज्ञानिकानेच अर्धी करून टाकली व्हॅक्सीनची आशा

महाराष्ट्र वगळता इतर राज्यांतील जिल्हे -देशाची डोकेदुखी ठरलेल्या या 25 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र वगळता, राजधानी दिल्लीतील सर्व 10 जिल्हे, गुजरातमधील अहमदाबाद आणि वडोदरा, तामिळनाडूतील चेन्नई, तेलंगाणातील हैदराबाद, पश्चिम बंगालमधील हावडा, तर मध्य प्रदेशातील इंदूर, उज्जैन, मंदसौर आणि बुरहानपूर या जिल्ह्यांचा समावेश आहेत.

CoronaVirus : चीनचा पलटवार; "नुकसान भरपाई मागणारे स्वप्न पाहतायत, आम्ही झुकणार नाही"

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMumbaiमुंबईNashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकार