शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

CoronaVirus News : भारतासाठी आनंदाची बातमी; "अमेरिका, इटली सारखा धोका नाही, अत्यंत वाईट परिस्थितीसाठीही देश तयार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 16:59 IST

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांत, कोरोना व्हायरसचा डबलिंग रेट 11 दिवसांचा राहिला आहे. गेल्या सात दिवसांचा विचार करता, डबलिंग रेटता 9.9 दिवस एवढा होता.

ठळक मुद्देअमेरिका, इटली, स्‍पेन आणि फ्रान्स सारख्या विकसित देशांमध्ये कोरोनामुळे लाखो लोकांना जीव गमवावा लागला आहेदेश वाईटातल्या वाईट स्थितीचा सामना करण्यासाठीही तयार - हर्षवर्धानआता भारतातील रिकव्हरी रेट 29.9% झाला आहे

नवी दिल्‍ली : कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार घालत आहे. अमेरिका, इटली, स्‍पेन आणि फ्रान्स सारख्या विकसित देशांमध्ये कोरोनामुळे लाखो लोकांना जीव गमवावा लागला आहे. भारतात मात्र, तशी परिस्थिती उद्भवणार नाही, असे केंद्र सरकारचा अंदाज सांगतो. यासंदर्भा, आरोग्य तथा कुटुंब कल्यानमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले, की 'देश वाईटातल्या वाईट स्थितीचा सामना करण्यासाठीही तयार झाला आहे. अनेक विकसित देशांमध्ये जशी परिस्थिती उद्भवली, तशी स्थिती भारतात उद्भवेल, असे दिसत नाही.'

या गोष्टीमुळे दिसतो आशेचा कीरण -केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांत, कोरोना व्हायरसचा डबलिंग रेट 11 दिवसांचा राहिला आहे. गेल्या सात दिवसांचा विचार करता, डबलिंग रेटता 9.9 दिवस एवढा होता. डॉ. हर्षवर्धन म्हणाले, देशात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांचा दर 3.3 टक्के आहे. तर भारतातील रिकव्हरी रेट 29.9% झाला आहे. हे फार चांगले संकेत आहेत, असेही हर्षवर्धन म्हणाले.

आणखी वाचा - CoronaVirus News : दीड महिन्यानंतर येऊ शकतं कोरोनावरील स्वस्त औषध, DGCIनं दिली 'क्लिनिकल ट्रायल'ची परवानगी

रुग्णांना डिस्‍चार्ज देण्याच्या नियमांत बलद -कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देताना पाळण्यात येणाऱ्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून शनिवारी सकाळी याबद्दलची माहिती देण्यात आली. नव्या नियमांनुसार एखाद्या रुग्णामध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नसल्यास आणि त्याची प्रकृती स्थिर असल्यास १० दिवसांतच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. डिस्चार्जनंतर रुग्णाला १४ दिवसांऐवजी ७ दिवस घरात क्वारंटिन करण्यात येईल. चौदाव्या दिवशी टेलि-कॉन्फरन्सच्या माध्यमातून रुग्णाची माहिती घेतली जाईल. 

देशात जवळपास 2 हजार जणांचा  मृत्यू -भारतात शनिवारी सकाळपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 59 हजारवर पोहोचली. तर आतापर्यंत जवळपास 1,981 जणांचा कोरोनाने बळी घेतला. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. येथे आतापर्यंत 19,063 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 731 जणांचा मृत्यू झाला आहे.

आणखी वाचा - CoronaVirus News : 'या' 6 व्हॅक्सीन मानवासाठी ठरू शकतात वरदान, कोरोनाच्या विळख्यातून करू शकतात जगाची सुटका

जगात 2.70 लाख जणांचा मृत्यू -जगभरात आतापर्यंत 2,70,000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाबाधितांची संख्या 40 लाखहून अधिक झाली आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. येथे आतापर्यंत 77,180 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या स्थानावर इंग्लंड असून, येथे आतापर्यंत 31,316 जणांचा मृत्यू झाला आहे.

अशी आहे जगाची स्थिती : CSSEने दिलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत सर्वाधिक 1,283,929 रुग्ण आढळले आहेत. यानंतर स्पेन, येथे 222,857, इटली 217,185, इग्लंड (212,629), रशिया (187,859), फ्रान्स 176,202, जर्मनी 170,588आणि, ब्राजीलमध्ये 146,894 रुग्ण आढळून आले आहेत.

आणखी वाचा - 'औरंगजेबा'ने बनवले होते मुस्लीम, तब्बल 40 कुटुंबांनी पुन्हा हिंदू धर्मात केला प्रवेश

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAmericaअमेरिकाItalyइटलीIndiaभारत