शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

CoronaVirus News : ...म्हणून मजुरांना आपल्या राज्यापेक्षा केरळ वाटतंय जास्त सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 15:09 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊनमुळे अनेकांना काहीच काम नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांनी पायी जाण्याचा पर्याय निवडला आहे. मात्र याच दरम्यान केरळने स्थलांतरीत मजुरांचं मन जिंकल्याची माहिती समोर आली आहे. 

गुवाहाटी - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही एक लाखांच्या वर पोहोचली आहे. तर 3000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात लॉकडाऊनसोबत तपासणीला गती दिली जात असताना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेकांना काहीच काम नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांनी पायी जाण्याचा पर्याय निवडला आहे. मात्र याच दरम्यान केरळने स्थलांतरीत मजुरांचं मन जिंकल्याची माहिती समोर आली आहे. 

केरळमध्येआसाममधून स्थलांतरीत झालेले अनेक मजूर हे काम करतात. सध्या इतर ठिकाणी असलेल्या मजुरांना आपल्या घराकडे जाण्याची ओढ लागली आहे. मात्र या उलट परिस्थिती ही केरळमध्ये पाहायला मिळत आहे. आसामच्या मजुरांना आपल्या घराकडे जाण्याची फारशी घाई नाही. कारण या परिस्थितीत ते आपल्या कामाच्या ठिकाणी अर्थात केरळमध्येच राहण्याला अधिक पसंती देत आहेत. मंगळवारपर्यंत आसाममध्ये वेगवेगळ्या राज्यांतून जवळपास 50 हजार स्थलांतरीत मजूर परतले आहेत. मात्र यामध्ये एकही मजूर हा केरळहून आलेला नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, या पूर्वेत्तर राज्यात जवळपास 40 ते 50 हजार तरुण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. आसामच्या धेमाजी जिल्ह्याचे रहिवासी असलेले दंबेस्वर बरुआ हे गेल्या 26 वर्षांपूर्वी कामाच्या शोधात ते केरळमध्ये आले. काही लोक सोडले तर अधिकतर स्थलांतरीत मजूर हे सध्या केरळमध्ये सुरक्षित आहेत. त्यांना सगळ्या सेवा-सुविधा मिळत आहेत. त्यामुळेच त्यांना आसामला परतण्याची इच्छा नाही अशी माहिती दंबेस्वर यांनी दिली आहे. 

केरळच्या पोलीस महासंचालकांनी मजुरांना आपला खासगी मोबाईल क्रमांक दिला आहे. त्यामुळे संकटकाळात ते तत्काळ पोलिसांची मदत घेऊ शकतात. आसामचे रहिवासी असलेल्या मंटू दत्ता यांनीही केरळच्या प्रशासनाचं कौतुक केलं आहे. मंटू हे एर्नाकुलम जिल्ह्यातील एका बर्फाच्या कारखान्यात फ्रिजिंग ऑपरेटर म्हणून काम करतात. 'स्थलांतरीत मजुरांच्या मदतीसाठी पंचायत सदस्यही धावून आले. ते सतत आमच्या संपर्कात आहेत. माझ्या मालकाकडून मला बेसिक पगार मिळत आहे. कारखाना सुरू झाल्यावर आम्हाला आमचा पूर्ण पगारही मिळणं सुरू होईल' असं मंटू यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : धोका वाढला! 4 दिवसांत 400 नवे रुग्ण; 'या' राज्यात येणारी चौथी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

बाप रे बाप! 8 दिवसांत घरातून निघाली सापाची तब्बल 123 पिल्ले; लोकांचा उडाला थरकाप

कौतुकास्पद! डॉ. हर्षवर्धन यांचा देशाला अभिमान; जागतिक आरोग्य संघटनेत मिळालं मानाचं स्थान

CoronaVirus News : सरकारच्या 'या' योजनेचा 1 कोटी गरिबांना मिळाला आधार; मोदी म्हणाले...

CoronaVirus News : काय सांगता? संगीत ऐकून कोरोनाग्रस्त बरे होणार; 'ही' थेरेपी फायदेशीर ठरणार

CoronaVirus News : बापरे! मास्क न लावल्यास अटक होणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKeralaकेरळAssamआसामIndiaभारतDeathमृत्यूPoliceपोलिस