शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

CoronaVirus: कोरोनाच्या मुळावर हल्ला करण्यासाठी सरकार सज्ज; मेगा प्लान तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 08:50 IST

Coronavirus लॉकडाऊननंतरही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; सरकारची नवी रणनीती तयार

नवी दिल्ली: देशातील कोरोनाचं संकट दिवसागणिक गंभीर होत चाललंय. या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. यातले जवळपास दोन आठवडे पूर्ण होत आले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांत देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढतेय. त्यामुळे आता सरकारनं कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज अनेक दिवसांपासून वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत होती. त्यादृष्टीनं सरकारनं पावलं टाकण्यास सुरुवात केली असून आरटी-प्रोसेसच्या माध्यमातून दर दिवशी चाचण्यांची संख्या दुप्पट करण्याचा प्रयत्न आहे. आरटी-प्रोसेसच्या माध्यमातून सर्वात अचूक चाचण्या केल्या जातात. त्यामुळे याच पद्धतीचा वापर चाचण्यांसाठी करण्यात येणार आहे. सध्या आयसीएमआरच्या अंतर्गत काम करणाऱ्या लॅब्स दर दिवशी १० हजार चाचण्या करतात. पुढल्या ३ दिवसांत यांची संख्या दुप्पट करण्याचं ध्येय ठेवण्यात आलंय. पुढील काही आठवडे ही क्षमता आणखी वाढवण्यावर काम केलं जाणार आहे. उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षयरोगाच्या चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या २५० ट्रूनॅट आणि २०० सीबी-नॅट यंत्रांचांदेखील संभाव्य कोरोना रुग्णांच्या चाचणीसाठी वापर करण्यात येईल. 'ट्रूनॅट आणि सीबी-नॅटनं एका दिवशी १२ चाचण्या केला जाऊ शकतात. आमच्याकडे रोशेची २ कोबॅस-६८०० यंत्रं आहेत. याशिवाय आणखी दोन यंत्रांच्या ऑर्डर्स देण्यात आल्या आहेत. या यंत्राच्या माध्यमातून दर दिवशी ५ हजार चाचण्या केल्या जाऊ शकतात,' असंदेखील त्यांनी सांगितलं.सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन चाचण्यांची संख्या वेगानं वाढवण्यासाठी रणनीती तयार करणार असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. आवश्यकता असलेल्या प्रकरणांच्या चाचण्या व्हाव्यात, यासाठी आरोग्य मंत्रालय आग्रही आहे. अनावश्यक चाचण्या करून यंत्रणेवरील ताण वाढवयाचा नाही, असं मंत्रालयानं अप्रत्यक्षपणे स्पष्ट केलंय.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या