शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

coronavirus: ‘जूनमध्ये कोरोना हाहाकार उडवणार; आपल्याला कोरोनासोबतच जगावे लागणार’, एम्सच्या संचालकांचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 17:45 IST

दिल्लीतील एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी एक चिंता वाढवणारे भाकीत केले आहे.

नवी दिल्ली - सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केल्यानंतरही देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच आहे. त्यामुळे शासन, प्रशासन आणि सर्वसामान्यांची चिंता दिवसागणिक वाढत आहे. दरम्यान, दिल्लीतील एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी एक चिंता वाढवणारे भाकीत केले आहे.

एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया म्हणाले की, ‘’कोरोनाची सद्यस्थिती पाहता आपल्याला कोरोनासोबत जगावे लागणार आहे, तसेच जून महिन्यामध्ये भारतात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळतील,’’ अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फायदा मिळाला आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढलेले नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

सध्याचा ट्रेंड पाहता कोरोनाचे रुग्ण जून महिन्यात आपल्या  सर्वोच्च पातळीवर असतील. मात्र हा आजार झटपट संपून जाईल असे नाही. आपल्याला कोरोनासोबत राहावे लागेल. हळूहळू कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होऊ लागेल, असे ते म्हणाले.

आपल्याला लॉकडाऊनचा निश्चितपणे फायदा मिळाला आहे. लॉकडाऊनमुळे आपल्या देशात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झालेला नाही. इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमी प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. रुग्णालयांनी लॉकडाऊनदरम्यान पुरेशी तयारी करून ठेवली आहे. डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच पीपीई किट्स, व्हेंटिलेटर्स आणि वैद्यकीय उपकरणांची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या...

मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा १०००० पार; आज ७५९ नवे रुग्ण

OMG! राज्यात कोरोनाचा 'विस्फोट'; नव्या रुग्णांच्या संख्येने सरकारची चिंता वाढली

CoronaVirus धारावीने चिंता वाढवली; नव्या रुग्णांमध्ये मोठी वाढ

CoronaVirus व्वा...! राज्यात केवळ दोन दिवसांत ७०० रुग्ण ठणठणीत झाले

दरम्यान, कोरोनाचे रुग्ण कधीपर्यंत आढळतील. हा आजार किती दिवसांपर्यंत अस्तित्वात राहील, याबाबत निश्चितपणे काही सांगता येणार नाही. मात्र एक बाब निश्चित आहे ती म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट शिखरावर असते तेव्हा तिथूनच तिच्या उतरणीला सुरुवात होते. भारतात जूनमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडतील. त्यानंतर हळूहळू कोरोना उतरणीला लागेल, अशी अपेक्षा करूया.

 आतापर्यंत देशात कोरोनाचे ५० हजारहून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तसेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. देशात आतापर्यंत १७८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतdoctorडॉक्टरdelhiदिल्ली