शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

Coronavirus: कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावीच लागेल; रक्कम केंद्राने ठरवावी, सुप्रीम कोर्टाचे महत्त्वपूर्ण आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 12:44 IST

Coronavirus in India:

नवी दिल्ली - गेल्या सव्वा वर्षापासून देशात थैमान घालत असलेल्या कोरोनाच्या साथीमुळे आतापर्यंत चार लाखांहून लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. (Coronavirus in India) कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी आणि या नुकसानभरपाईची रक्कम किती असावी हे केंद्र सरकारने स्वत: ठरवावे, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. (must compensate the families of those who die due to Coronavirus; The amount should be decided by the Center, an important order of the Supreme Court)

सर्वोच्च न्यायालयाने कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंवर प्रत्येकी चार लाख रुपये नुकसानभरपाई देणे शक्य नसल्याचे मान्य केले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने एनडीएमएला सांगितले की, किमान मोबदला देता येईल अशी एक व्यवस्था बनवण्यात यावी.

कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचे मृत्यू प्रमाणपत्र केंद्र सरकारने जारी करावेत. तसेच जी प्रमाणपत्रे आधीच जारी झाली आहेत, त्यामध्ये सुधारणा करण्यात याव्यात, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिली. तसेच यावर सुनावणी करताना केंद्र सरकारने एनडीएमएच्या अधिकाऱ्यांना फटकारही लगावली.

या प्रकरणी अनेक याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केली होती. कोरोनामुळे ज्या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, अशा व्यक्तींच्या कुटुंबीयांना आपत्ती कायद्यांतर्गत चार लाख रुपयांपर्यंतची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी या याचीकांमधून करण्यात आली होती. याशिवाय याचिकाकर्त्यांकडून कोविड डेथ सर्टिफिकेटबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांकडे उत्तर मागितले होते.

मात्र केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात जे शपथपत्र देण्यात आले त्यामध्ये असे करण्यास केंद्र सरकारकडून असमर्थता व्यक्त करण्यात आली. केंद्र सरकारकडून सांगण्यात आले की, असे करणे शक्य नाही, त्यापेक्षा सरकारकडून आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. चार लाख रुपयांची मदत ही कुठल्याही आपत्तीच्या वेळी मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिली जाते. मात्र कुठल्याही साथीच्या वेळी अशी मदत देणे शक्य होत नाही.  

भारतात गेल्या सव्वा वर्षापासून कोरोनाचा कहर सुरू आहे. या साथीमुळे देशाच आतापर्यंत चार लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर या साथीचा प्रभाव आता काहीसा कमी होऊ लागला आहे. मात्र अजूनही देशात दररोज चाळीस हजारांहून अधिक रुग्णांचे निदान होत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय