शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Coronavirus : कोरोनाचा कहर सुरू असतानाच या गावात पसरला रहस्यमय आजार, पाच जणांचा मृत्यू, ग्रामस्थ भयभीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 14:18 IST

Coronavirus: गावात सातत्याने होत असलेल्या मृत्युंमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच त्यामुळे ग्रामस्थांनी स्वत:ला घरांमध्ये कोंडून घेतले आहे. गावातील रस्त्यांवर शुकशुकाट पसरला आहे.

लखनौ - संपूर्ण देशात वाढत असलेला कोरोनाचा फैलाव आणि या विषाणूने ग्रामीण भागात केलेला शिरकाव यामुळे शासन आणि प्रशासन त्रस्त आहे. त्यातच आता उत्तर प्रदेशमधील शामली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील सोंटा रसूलपूर गावामध्ये अज्ञान आजारामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण तापाने फणफणत आहेत. गावात सातत्याने होत असलेल्या मृत्युंमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच त्यामुळे ग्रामस्थांनी स्वत:ला घरांमध्ये कोंडून घेतले आहे. गावातील रस्त्यांवर शुकशुकाट पसरला असून, गावात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला असावा, अशी भीती ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच झालेल्या मृत्यूंचे कारणही कोरोना आहे, असा ग्रामस्थांचा दावा आहे. (Mysterious disease spreads in the village In UP, 5 death)

मात्र हा आजार कोरोना आहे की अन्य काही याबाबत सध्यातरी स्पष्टता येऊ शकलेली नाही. कारण सरकारी आकडेवारीमध्ये सोंटा रसूलपूर गावात कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद नाही. मात्र अनेक लोक रहस्यमय आजारामुळे मृत्युमुखी पडले आहेत. 

या रहस्यमय आजाराने मृत्यू झालेल्यांची नावे नझीर, हासिद, आबिदा, तन्वीर आणि अफसाना यांचा समावेश आहे. मात्र हा आजार पसरत असताना या भागात प्रशासनाचा कुठलाही अधिकारी फिरकला नाही. तसेच आरोग्य विभागाने शिबीर घेऊन तपासणी केली नाही, असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. मात्र सातत्याने होत असलेल्या मृत्युंमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सामान्य मृत्यू असेल तर कोविडचे नियम पाळले जात नाहीत. मात्र दहशतीचे वातावरण असल्याने या मृतांच्या अंत्ययात्रेमध्ये फारसे नातेवाईक सहभागी होत नाही आहेत. तसेच ग्रामस्थही तुरळक प्रमाणातच अंत्ययात्रेला हजेरी लावत आहेत. 

दरम्यान, या प्रकरणाची शामलीच्या डीएम जसजीत कौर यांनी दखल घेतली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरोघरी सर्वै करण्यात येत आहे. पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच निरीक्षण समित्याही तैनात करण्यात आल्या आहेत. ही मोहीम एकूण पाच दिवसांची होती. मात्र आता तिचा अवधी वाढवण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच ग्रामीण भागातील संसर्गाला अटकाव करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही त्या म्हणाल्या.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशHealthआरोग्य