शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Coronavirus New Guidelines: परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांना दिलासा; कोरोनाबाबत केंद्राची नवी नियमावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 14:34 IST

कोरोनाच्या परिस्थितीत सुधार आल्यानं केंद्रीय मंत्रालयानं परदेशातून येणाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशात जाणाऱ्या आणि येणाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं नवी नियमावली तयार केली आहे. गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं याबाबत आदेश काढला. यात परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांना नव्या नियमावलीमुळे दिलासा मिळणार आहे. मंत्रालयानं जोखीम असलेल्या देशांची श्रेणी रद्द केली आहे. त्याशिवाय ७ दिवसांच्या सक्तीच्या होम क्वारंटाइनमधूनही प्रवाशांना सूट देण्यात आली आहे.

कोरोनाच्या परिस्थितीत सुधार आल्यानं केंद्रीय मंत्रालयानं परदेशातून येणाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. नवी नियमावली १४ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. नव्या नियमावलीनुसार, आता जोखीम श्रेणीतील देश आणि अन्य देश यात कुठलाही फरक नसणार आहे. त्यासोबतच आरोग्य मंत्रालयानं परदेशातून भारतात येणाऱ्यांसाठी ७ दिवसांच्या होम क्वारंटाइनमध्येही बदल केला आहे. या प्रवाशांना १४ दिवस स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.

भारतात येण्यापूर्वी पोर्टलवर द्यावी लागेल माहिती

नव्या नियमावलीनुसार, जो कुणाला भारतात यायचं असेल त्यांनी आधी सुविधा पोर्टलवर एक माहिती पत्रिका भरुन द्यायची आहे. त्यात मागील १४ दिवसांच्या प्रवासाची माहिती द्यायची आहे. खालील दिलेल्या पोर्टलवर क्लिक करुन (https://www.newdelhiairport.in/airsuvidha/apho-registration) तुम्ही माहिती भरु शकता.

नव्या नियमावलीतील प्रमुख अटी

परदेशातून येणाऱ्यांसाठी ७२ तासांपूर्वी आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह अथवा पूर्ण लसीकरण झालेले प्रमाणपत्र एअर सुविधा पोर्टलवर अपलोड करावं लागेल

संबंधित एअरलाइन्स आणि ट्रॅव्हल एजन्सीने प्रवाशांना तिकीट देण्यापूर्वी देशातील कोरोना प्रोटोकॉल माहिती आणि संबंधित नियमांबाबत माहिती द्यावी.

विमानात केवळ याच प्रवाशांना प्रवास करुन द्यावा जे एसिम्टोमॅटिक असतील. त्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू एप डाऊनलोड करावा लागेल

उड्डाणावेळी विमानात होणाऱ्या उद्घोषणेत कोविड १९ पासून सावध राहणाऱ्या सूचनांची माहिती द्यावी लागेल.

विमान पायलट आणि क्रू मेंबर्स कोविड नियमांचे पालन करतील. जर कुठल्याही प्रवाशाला कोविड लक्षणं आढळली तर त्याबाबत योग्य ती तक्रार करुन प्रोटोकॉलनुसार संबंधित प्रवाशाला आयसोलेट करावं लागेल.

देशात कोरोनाची स्थिती

गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल ६७ हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या