शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

CoronaVirus News: अनलॉकच्या आधी ७० टक्के ज्येष्ठांचे लसीकरण हवे -भार्गव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 06:14 IST

CoronaVirus News: भार्गव म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांशिवाय ४५ वयाच्या पुढील व गंभीर आजारी असलेल्या किमान ७० टक्के लोकांचे लसीकरण झाल्यानंतरच अनलॉक केले जावे.

नवी दिल्ली : राज्यांनी ६० पेक्षा जास्त वयाच्या कमीत कमी ७० टक्के ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करूनच अनलॉक करावे, असा सल्ला आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी दिला. भार्गव म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांशिवाय ४५ वयाच्या पुढील व गंभीर आजारी असलेल्या किमान ७० टक्के लोकांचे लसीकरण झाल्यानंतरच अनलॉक केले जावे. अनलॉकनंतर कोरोना संक्रमणात थोड़ी वाढ होऊ शकते अशी शंका व्यक्त करून भार्गव म्हणाले, आरोग्य सेवांना सध्याच्या अवस्थेत अनलॉकमध्येही कायम ठेवले जावे. अनलॉक अशा ठिकाणी केले जावे जेथे संक्रमणाचा दर सलग सात दिवस पाच टक्क्यांच्या कमी असेल. अनलॉकमध्येही मास्क आणि सामाजिक अंतर नियमांचे पालन झाले पाहिजे. लसीबद्दल गावागावांत होत असलेल्या चुकीच्या प्रचारावर डॉ. भार्गव म्हणाले, आधी शहरांत अशा अफवा होत्या. तेथे आता लोक लस घेण्यासाठी पळापळ करीत आहेत. एली लिलीच्या औषधास मंजुरी अमेरिकेतील औषधी कंपनी एली लिली यांना कोरोनावरील उपचारासाठी भारतात औषधांच्या आपत्कालीन उपचारास परवानगी मिळाली आहे. बामलानिविमॅब ७०० मि.ग्रॅ. आणि एटेसेविमॅब १४०० मि.ग्रॅ. या औषधांच्या एकीकरणास मंजुरी देण्यात आली आहे. या कंपनीचे भारतासाठीचे कार्यकारी संचालक लुका विसीनी यांनी सांगितले की, भारतातील आरोग्य सुविधांसाठी आणि उपचारांसाठी आमच्याकडे एक पर्याय आहे. हे औषध १२ वर्षांवरील, ४० किलोपेक्षा अधिक वजन असलेल्यांना दिले जाते. या औषधाचा उपयोग केवळ आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांवर केला जातो. याशिवाय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या गंभीर रुग्णांनाही हे इंजेक्शन दिले जाईल. मात्र, जे रुग्ण ऑक्सिजनवर आहेत, त्यांना हे औषध दिले जाणार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस