शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

CoronaVirus News: 'या' वयोगटामधील मुलांकडून कोरोना संसर्गाचा धोका अधिक; तज्ज्ञांनी केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 10:56 IST

देशभरात कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या ३४,९६८ झाली आहे

नवी दिल्ली:  देशामध्ये पहिल्यांदाच एकाच दिवसात कोरोनाचे ५० हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळल्याचा प्रकार गुरुवारी घडला. ही आजवरची सर्वाधिक रुग्णसंख्या वाढ आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या १५ लाख ८३ हजारपेक्षा जास्त झाली आहे. तर, या आजारातून पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या १० लाखांवर गेली आहे. त्यामुळे शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ सध्या या आजाराबाबत विविध माहिती शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, यासाठी रिसर्चही केले जात आहे. यातून विविध शोध लागत आहेत. अशाच एका रिसर्चमध्ये आता ५ वर्षांखालील मुलांकडून कोरोना संक्रमणाचा धोका सगळ्यात जास्त असल्याचे समोर आले आहे. 

तज्ज्ञांनी केलेल्या या रिसर्चनूसार, लहान मुलांमध्ये त्यांच्या श्वसनमार्गाच्या वरच्या भागात प्रौढांपेक्षा व्हायरल लोड १० पट ते १०० पट जास्त आहे. कोरोना असणार्‍या मोठ्या मुलांमध्ये व्हायरल लोड प्रौढांमधील पातळीप्रमाणेच आहे. या अभ्यासामध्ये व्हायरल न्यूक्लिक अॅसिडचे प्रमाण ५ वर्षांखालील मुलांमध्ये जास्त असल्याचे दिसून आले. या अभ्यासामध्ये केवळ व्हायरल न्यूक्लिक अॅसिडचा अभ्यास करण्या आला. संसर्गजन्य व्हायरसचा नाही, म्हणजेच ही मुलं व्हायरसचा प्रसार करतात की नाही हे अद्याप स्पष्ट नाही आहे. मात्र ५ वर्षांखालील मुलांकडून कोरोना संक्रमणाचा धोका सगळ्यात जास्त असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

दरम्यान, देशभरात कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या ३४,९६८ झाली आहे. दिल्लीमध्ये ३९०७, तमिळनाडूमध्ये ३७४१, गुजरातमध्ये २१४७, उत्तर प्रदेशमध्ये १५३०, पश्चिम बंगालमध्ये १४९०, आंध्र प्रदेशमध्ये १,२१३, मध्य प्रदेशमध्ये ८४३ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. मरण पावलेल्यांपैकी ७० टक्क्यांहून अधिक लोकांना एकाहून जास्त व्याधी होत्या.

कोरोना रुग्णांचा देशातील मृत्यूदर २.२३ टक्के इतका असून जागतिक स्तरावरील मृत्यूदरापेक्षा तो कमी आहे. कोरोना रुग्णांचा वेळीच शोध घेऊन, त्यांची चाचणी व उपचार करणे ही नीती अवलंबल्यामुळेच देशातील मृत्यूदर कमी असल्याचा केंद्र सरकारचा दावा आहे. १९ जून रोजी देशातील मृत्यूदर ३.३ टक्के होता.

कोरोनाच्या १ कोटी ८१ लाखांहून अधिक चाचण्या

इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, २९ जुलै रोजी देशभरात कोरोनाच्या ४,४६,६४२ चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे एकूण चाचण्यांची संख्या १,८१,९०,३८२ झाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतdocterडॉक्टर