शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
2
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
3
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
4
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
5
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
6
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
8
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
9
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
10
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
11
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
12
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
13
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
14
“आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील”; तिसऱ्या आघाडीतील नेत्याचे मोठे विधान
15
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
16
"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...
17
'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा
18
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
19
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
20
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण

CoronaVirus News : धोका वाढला! देशात एका दिवसात ७० हजार नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 5:41 AM

CoronaVirus News : रुग्णांचा लवकर लागणारा शोध व तातडीने होणारे उपचार यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अतिशय कमी राखण्यात भारताला यश आले आहे.

नवी दिल्ली : देशामध्ये गुरुवारी कोरोनाचे ६९,६५२ नवे रुग्ण आढळून आले असून, ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या २८ लाख ३६ हजारांहून अधिक झाली आहे. कोरोनातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांची संख्या आता २० लाख ९६ हजार झाली असून, अशा व्यक्तींचे प्रमाण ७३.९१ टक्के झाले आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या २८,३६,९२५ वर पोहोचली असून गुरुवारी ९७७ जण या आजाराने मरण पावले. त्यामुळे कोरोनाच्या एकूण बळींची संख्या ५३,८६६ झाली आहे. मात्र, देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.९० टक्क्यांपर्यंत घटला आहे. या आजारातून बरे झालेल्यांची संख्या २०,९६,६६४ वर पोहोचली आहे. दररोज होणाऱ्या कोरोना चाचण्यांचे वाढलेले प्रमाण, त्यामुळे रुग्णांचा लवकर लागणारा शोध व तातडीने होणारे उपचार यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अतिशय कमी राखण्यात भारताला यश आले आहे.कोरोना बळींची संख्या तामिळनाडूमध्ये ६,१२३, कर्नाटकमध्ये ४,३२७, दिल्लीमध्ये ४,२३५, आंध्र प्रदेशमध्ये २,९०६, गुजरातमध्ये २८३७, उत्तर प्रदेशमध्ये २,६३८, पश्चिम बंगालमध्ये २,५८१ व मध्य प्रदेशमध्ये १,१५९ आहे. देशात सध्या ६,८६,३९५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ७ आॅगस्ट रोजी कोरोना रुग्णांची एकूण संख्या २० लाखांहून अधिक झाली होती.>लसीच्या साठेबाजीची चिंताजगभरात कोरोना लसीच्या चाचण्या सुरू असून, त्या यशस्वी झाल्यानंतरत्यांच्या संभाव्य साठेबाजीबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोसअदनोम घेबियस यांनी चिंता व्यक्त केली आहे. श्रीमंत व विकसित देश कोरोनाची लस जास्त किमतीला खरेदी करून गरीब देशांना यापासून वंचितकरू शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे.

 

एकूण चाचण्या 3.26 कोटीइंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, १९ आॅगस्ट रोजी ९,१८,४७० कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे देशातील चाचण्यांची एकूण संख्या आता ३,२६,६१,२५२ इतकी झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या