शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

CoronaVirus News: ...तर लवकरच देशात कोरोनाची तिसरी लाट; मोदी सरकारचा राज्यांना धोक्याचा इशारा, निर्बंध वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 8:52 PM

CoronaVirus News: केंद्रीय गृह सचिवांनंतर आरोग्य सचिवांचं सर्व राज्यांना महत्त्वाचं पत्र

नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत चालली आहे. मात्र अधूनमधून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं चिंता कायम आहे. त्यातच कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानं अनेक राज्यांनी निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणांवरील गर्दी वाढली आहे. पर्यटनस्थळीदेखील पर्यटक मोठ्या संख्येनं जाऊ लागले आहेत. याबद्दल केंद्र सरकारनं स्पष्ट शब्दांत चिंता व्यक्त केली आहे. 

लॉकडाऊनमधून सवलत दिली जात असताना अनेक ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन होत असल्याचं दिसत आहे. मंडया, बस स्थानकांसह पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना पत्र लिहिलं आहे. सध्या दिसत असलेल्या बेजबाबदारपणामुळे तिसरी लाट येऊ शकते आणि समस्या वाढू शकतात, असा धोक्याचा इशारा केंद्रीय सचिवांनी पत्रातून दिला आहे. कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळले जातील याची काळजी घेण्याच्या सूचना सचिवांनी दिल्या आहेत. 

बुधवारी केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्य सरकारांना पत्र पाठवलं होतं. त्यानंतर आता केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना पत्र पाठवून काळजी घेण्याचे आणि नियम पाळण्याचे आदेश दिले आहेत. 'डोंगराळ भागातील पर्यटनस्थळांवर कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं सर्रास उल्लंघन होत आहे. त्या ठिकाणी नियम पाळले जातील याची काळजी घ्या. नियमांचं उल्लंघन होत असल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा,' अशा स्पष्ट सूचना राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या