शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

Coronavirus: गुड न्यूज! देशातील १५ राज्यातील २५ जिल्ह्यात मागील १४ दिवसात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 18:44 IST

१४ दिवसानंतरही या २५ जिल्ह्यात कोरोना रुग्ण न आढळल्याने हे जिल्हे कोरोनाविरुद्ध लढाई जिंकले आहेत.

ठळक मुद्देदेशातील १५ राज्यातील २५ जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळला नाहीकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याचा समावेश

नवी दिल्ली – देशात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना लोकांना दिलासा देणारी बातमीही समोर आली आहे. देशात आतापर्यंत ९ हजार १५२ रुग्ण आढळले आहेत, ८५७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर कोरोनामुळे ३०८ लोकांचा जीव गेला आहे. तर एका दिवसात १४१ कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. देशभरातील १५ राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये मागील १४ दिवसांत एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. या २५ जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. पण गेल्या १४ दिवसांत एकही नवा रुग्ण आढळला नाही.

देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केलं होतं. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार आहे. १४ दिवसानंतरही या २५ जिल्ह्यात कोरोना रुग्ण न आढळल्याने हे जिल्हे कोरोनाविरुद्ध लढाई जिंकले आहेत. यापुढेही या जिल्ह्यात नवीन रुग्ण आढळता कामा नये यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, जेव्हा या जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते तेव्हा जिल्हा प्रशासनाने कंटेनमेंट स्ट्रैटिजी धर्तीवर काम केले होते. ज्याचा चांगला परिणाम आता समोर आला आहे. पण आपल्याला यापुढेही अशाप्रकारचे ऊर्जेने काम करायला लागणार आहे. आगामी काळातही या जिल्ह्यांमध्ये नवीन रुग्ण आढळणार नाही याची काळजी घेतली जाईल असं ते म्हणाले.

तसेच प्रत्येक अत्याधिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. टाइमली रिस्पॉन्ससाठी कटिंग एज टेक्नोलॉजीचा वापर करणं गरजेचे आहे. आम्ही तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लाईव्ह केस ट्रेकिंग, केस मॅनेजमेंट आणि कंटनेमेंट प्लान लागू करण्यासोबतच त्याच्यावर निरीक्षण ठेवण्याचंही काम केले असं लव अग्रवाल यांनी सांगितले.

या २५ जिल्ह्यात कर्नाटकातील ४, छत्तीसगड ३, केरळ २, बिहार ३, आणि हरियाणातील ३ जिल्ह्यांचा समावेश आहे. या पाच राज्यात एकूण ८८८ कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. यातील २८५ रुग्ण बरे होऊन पुन्हा घरी परतले आहेत. तर पाच राज्यात मिळून १२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

उत्तराखंडमध्ये १०० तासात एकही रुग्ण नाही. ७ रुग्ण बरे झाले

उत्तराखंडमध्येही चांगली बातमी आहे. मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी सांगितले की, मागील १०० तासात एकही कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. आतापर्यंत ७ रुग्ण पूर्णपणे ठीक झाले आहेत. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी काही जिल्ह्यात अद्याप कर्फ्यू लावण्यात आला आहे.

या २५ जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही

गोंदिया-महाराष्ट्र

राजनांदगाव, दुर्ग आणि विलासपूर - छत्तीसगड

देवानगिरी, उडुपी, तुमकुरु आणि कोडगु - कर्नाटक

वायनाड आणि कोट्टायम - केरळ

वेस्ट इंफाल - मणिपूर

दक्षिण गोवा-गोवा

राजौरी - जम्मू-काश्मीर

आयझॉल वेस्ट-मिझोरम

माहे-पुडुचेरी

एसबीएस नगर-पंजाब

पटना, नालंदा, मुगर-बिहार

प्रतापगड - राजस्थान

पानीपत, रोहतक, सिरसा-हरियाणा

पौरी गढवाल - उत्तराखंड

भद्रद्री कोत्तागुडम - तेलंगणा  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या