शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
2
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

Coronavirus : दिलासादायक! भारतात कमी होतोय कोरोनाचा प्रभाव; ७ गोष्टींवरून मिळतायत संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 5:05 PM

भारतात कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी कमी होत चालल्याचं चित्र समोर आलं असून, ७ गोष्टीमधून याचे संकेत मिळत आहेत. 

ठळक मुद्देकोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालल्यानं देशात संक्रमितांची संख्यासुद्धा वाढली आहेकेंद्रातल्या मोदी सरकारनंही २१ दिवसांचा लॉकडाऊन कालावधी वाढवून ३ मेपर्यंत केला आहे. भारतात कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी कमी होत चालल्याचं चित्र समोर आलं असून, ७ गोष्टीमधून याचे संकेत मिळत आहेत. 

नवी दिल्लीः कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालल्यानं देशात संक्रमितांची संख्यासुद्धा वाढली आहे. केंद्रातल्या मोदी सरकारनंही २१ दिवसांचा लॉकडाऊन कालावधी वाढवून ३ मेपर्यंत केला आहे. त्यामुळे लोकांनी घरातच राहावं, घराबाहेर न पडता सामाजिक अंतर राखावं, असं आवाहनही केंद्राकडून जनतेला करण्यात येत आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकार आणि इतर राज्य सरकारंही कोरोनाला थोपवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.देशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १७ हजारांच्या पलीकडे गेली असली तरी सध्या १४१७५ रुग्ण अजूनही कोरोना संक्रमित आहेत. कोरोना संक्रमितांपैकी २३०२ लोक कोरोनापासून मुक्त झाले आहेत. तर कोरोनं मृत्यू झालेल्यांची संख्याही ५४३च्या वर गेली आहे. भारतात कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी कमी होत चालल्याचं चित्र समोर आलं असून, ७ गोष्टीमधून याचे संकेत मिळत आहेत. या ७ गोष्टी भारतासाठी दिलासा देणाऱ्या आहेत: -

  • कोरोना विषाणूच्या आजारापासून मुक्त होणारी पहिली गोष्ट म्हणजे देशातील एकूण ७३६जिल्ह्यांपैकी ४११ जिल्हे असे आहेत ज्यात रविवारपर्यंत एकही कोरोनाचं प्रकरण समोर आलेलं नाही. याचा अर्थ असा आहे की. जवळपास अर्ध्या देशात कोरोनाचे एकही रुग्ण आज सापडलेला नाही. 
  •  राजस्थानमधील भिलवाडामध्ये एकही प्रकरण आज समोर आलेलं नाही, ही दिलासा देणारी बाब आहे. सुरुवातीला भिलवाडा हा कोरोनाचा हॉटस्पॉट होते. भिलवाड्याला कोरोनापासून वाचवण्यासाठी प्रशासनाने वेगाने पावलं उचलली होती.. भिलवाड्या हद्दी बंद करण्यात आल्या होत्या, तसेच लॉकडाऊनचेही काटेकोरपणे पालन केले जात आहे. यासह प्रत्येक व्यक्तीची चाचणी घेण्यात येत असून, ट्रॅकिंगही करण्यात आले आहे. त्याचा परिणाम म्हणून भिलवाड्यात कोरोनाचे रुग्ण सापडणं जवळपास बंदच झालं आहे. भिलवाडा हा कोरोनापासून पूर्णपणे मुक्त झाला असून, कोणतेही नवीन प्रकरण समोर येत नाही.
  • भिलवाड्याबरोबर गोवा हे राज्यसुद्धा कोरोनापासून मुक्त झालं आहे. राज्यात एकूण ७ प्रकरणे नोंदविण्यात आली होती, त्यापैकी ६ रुग्ण आधीच बरे झाले आहेत. रविवारी शेवटच्या रुग्णालाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
  • लॉकडाऊनपूर्वी कोरोनाचे रुग्ण तीन दिवसांत दुप्पट सापडत होते. आता दुप्पट रुग्ण सापडण्यास जवळपास सरासरी 6.2 दिवस लागतात. काही राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. या राज्यांमध्ये केरळ, आसाम, तामिळनाडू, पंजाब, यूपी, हरियाणा, लडाख, दिल्ली, चंदीगड इत्यादींचा समावेश आहे.
  • इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ची कोरोना टेस्टिंग क्षमता प्रत्येक येणा-या दिवसागणिक वाढतच चालली आहे. सरकारनेही आपल्या योजनेची क्षमता दररोज सुमारे ८० हजारांपर्यंत वाढवावी लागेल, असं काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. जी सध्या दररोज 37 हजारांच्या जवळपास पोहोचली आहे.
  • कोरोनासारख्या जागतिक संसर्गाच्या रोगाशी दोन हात करणाऱ्या केरळ राज्याचा गवगवा केला जातोय. कारण केरळमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांच्या बरं होण्याचं प्रमाण ५६.३ टक्के असून, देशातील इतर राज्यांच्या तुलनेत ही बाब चांगली आहे. 
  • उत्तर प्रदेशातील बर्‍याच जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव कमी होत चालला आहे. पिलिभीत, महाराजगंज आणि हाथरस हे कोरोनामुक्त जिल्ह्ये आहेत. तिथले सर्व रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.  
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या