शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कोरोनाची चौथी लाट आल्यास भारतावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांनी केलं धक्कादायक विधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 20:23 IST

Coronavirus Updates in India: चीन आणि दक्षिण कोरियासह युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण पुन्हा एकदा वाढत असल्याचं दिसून आलं आहे.

Coronavirus Updates in India: चीन आणि दक्षिण कोरियासह युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण पुन्हा एकदा वाढत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे भारतातही चिंता व्यक्त केली जात आहे. आता दिल्ली एम्सने या मुद्द्यावर मोठं विधान केलं आहे. "SARS-CoV-2 (कोरोनाव्हायरस) हा 'RNA' विषाणू आहे. त्याच्या प्रकारांमध्ये बदल होत राहणार हे नक्की. त्यात एक हजाराहून अधिक बदल झाले आहेत. मात्र, असे केवळ 5 प्रकार समोर आले असून, ते चिंतेचं कारण बनलं आहे", AIIMS दिल्लीचे वरिष्ठ एपिडेमियोलॉजिस्ट डॉ. संजय राय म्हणाले. 

"गेल्या वर्षी भारताला कोरोना व्हायरसच्या अत्यंत विनाशकारी दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागला, जो खूप दुर्दैवी होता. मात्र, आता कोरोना लसीकरणामुळे लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. यासोबतच भारतीयांमध्ये निर्माण होणारा नैसर्गिक संसर्ग ही एक मोठी शक्ती आहे, जी लोकांना दीर्घ काळासाठी चांगले संरक्षण प्रदान करते. भविष्याबद्दल बोलायचे झाल्यास, कोरोनाच्या कोणत्याही लाटेचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाही", असं डॉ. संजय राय म्हणाले. 

'मास्क वापर शिथिल करण्याचा सरकार विचार करू शकते'"सध्याची वेळ अशी आहे की भारत सरकार मास्क वापरण्याचा नियमात शिथिलता आणण्याचा करण्याचा विचार करू शकते. ज्येष्ठ नागरिक आणि संसर्गाचा संशय असलेल्या लोकांनी खबरदारी म्हणून मास्क घालणे सुरू ठेवावं", असं डॉ. राय म्हणाले. भविष्यात कोरोनाव्हायरसचे कोणतेही नवीन प्रकार उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारनं जीनोमिक सिक्वेन्सिंगसह SARS-CoV-2 चं निरीक्षण करणं सुरू ठेवावं, यावरही राय यांनी भर दिला. 

'कोरोना भारतात जास्त संसर्गजन्य होणार नाही'आणखी एक एपिडेमियोलॉजिस्ट डॉ चंद्रकांत लहरिया यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसचे नवीन प्रकार भारतात समोर आले असले तरी, भारतात संक्रमितांची संख्या वाढण्याची शक्यता फार कमी आहे. "जर आपण सीरो सर्वेक्षण, लसीकरण कव्हरेज आणि व्हायरसच्या ओमिक्रॉन व्हेरिअंटचा प्रसार यांचा डेटा पाहिला, तर असा निष्कर्ष काढता येईल की भारतात कोरोना महामारी संपली आहे. अशा परिस्थितीत पुढील काही महिन्यांपर्यंत भारतात कोरोनाची नवी लाट आणि नवीन रूपे समोर येण्याची शक्यता फारच कमी आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा बहुतेक लोकसंख्येला मास्क घालण्याच्या अनिवार्यतेपासून सूट दिली जाऊ शकते", असं डॉ. चंद्रकांत लहरिया म्हणाले. 

'लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती विकसित झाली आहे'सफदरजंग हॉस्पिटलमधील कम्युनिटी मेडिसिनचे प्रमुख डॉ जुगल किशोर यांनीही हेच मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, ''सीरो सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की 80-90 टक्के लोकसंख्येला संसर्ग झाला आहे. म्हणजेच आता भारतीयांमध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे. अशा परिस्थितीत सरकार आता लोकांना मास्क घालण्यासारख्या उपायांमधून सूट देऊ शकते"

लसीकरणावरील नॅशनल कन्सल्टन्सी ग्रुपच्या कार्यगटाचे अध्यक्ष डॉ. एन.के. अरोरा यांनी देशात लसीकरणाची व्याप्ती जास्त आहे. अशा परिस्थितीत भारतात कोणत्याही नव्या लाटेचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे, असं मत व्यक्त केलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक