शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या
2
एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! एक कुटुंब दत्तक घ्यावे लागणार
3
डझनभर वंदे भारत ट्रेन ठरतायत पांढरा हत्ती; निम्म्या जागाही भरताना मुश्कील, महाराष्ट्रातील एक...
4
१५०० घरांची झडती, १०० पोलीस, प्लास्टिक कंटेनर...; ५ वर्षांच्या मुलीसोबत थरकाप उडवणारं कृत्य
5
"...नाहीतर अदानींकडून काॅन्ट्रॅक्ट काढून घेऊ", फडणवीसांचं धारावी प्रकल्पाबद्दल मोठं विधान
6
IND vs BAN, 2nd Test : जबरदस्त कॅच! पुन्हा पुन्हा रिप्लाय अन् जैस्वालचा प्रयत्न ठरला 'यशस्वी' (VIDEO)
7
"मी सिनेमा काढणार", संजय राऊतांनी नावही केले जाहीर; काय बोलले?
8
Vedanta Group : भंगार विकता विकता उभा केला कोट्यवधींचा व्यवसाय; पाहा Vedanta ची सुरूवात कशी झाली?
9
शेख हसिनांच्या विरोधात कोणी कारस्थान रचले? युनूसनी अमेरिकेत भर मंचावर नाव सांगितले
10
Exclusive: प्रिया बापटची Bigg Boss वर प्रतिक्रिया, म्हणाली, "तीनच लोक खरे वाटतात ते म्हणजे..."
11
स्टंटबाजीमुळे कालव्यात पडली कार; पोलिसांची मोठी कारवाई, ५ तरुणांची जेलमध्ये रवानगी
12
"अरबाजचा साखरपुडा झालाय वाटतं", आईचा मोठा गौप्यस्फोट ऐकून हादरली निक्की! अरबाजचे कपडे घेतले अन्...
13
शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, कुणी दिली होती पंतप्रधान पदाची ऑफर? नितीन गडकरी म्हणाले...
14
IPL 2025 : शाहरुखच्या KKR नं खेळला मोठा डाव; MS धोनीच्या सहकाऱ्यानं घेतली गौतम गंभीरची जागा
15
'आदिपुरुष'मधील रावणाच्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलला सैफ, म्हणतो- "आपण धर्मापासून लांबच..."
16
आता शेअर विकल्यास केवळ द्यावे लागणार ३.५ रुपये; कोट्यवधी गुंतवणूकदारांना फायदा; काय आहे नवा नियम?
17
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
18
Tax Rule Changes : गॅस सिलिंडरपासून क्रेडिट कार्डापर्यंत, १ ऑक्टोबरपासून होणार 'हे' ५ बदल; खिशावर होणार परिणाम
19
India vs Bangladesh, 2nd Test : रोहितनं टॉस जिंकला, 'नो चेंज' म्हणत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय
20
आधी पॅरिस, आता अबू धाबी; ऐश्वर्यासोबत लेकीची परदेशवारी; नेटकरी म्हणतात, 'शाळा नाही...'

Coronavirus Updates in India: देशात वाढतायेत मृत्यूचे आकडे; गेल्या २४ तासांत ४,२०९ रुग्ण दगावले, आरोग्य विभाग चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 6:16 AM

आरोग्य मंत्रालयाने केली चिंता व्यक्त : योग्य नियोजन करण्याच्या रुग्णालयांना सूचना

विकास झाडे

नवी दिल्ली : कोरोना रुग्णाच्या मृत्यूच्या आकडेवारीने पुन्हा एकदा चार हजारांचा टप्पा गाठला आहे. मृत्यूची संख्या कमी होणे आणि पुन्हा चार हजारांवर जाणे असे कित्येक दिवस सुरू आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत चिंता व्यक्त केली असून रुग्णांच्या शुश्रूषाचे योग्य नियोजन करा, अशा सूचना देशभरातील रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.

गेल्या २४ तासांमध्ये देशभरात ४ हजार २०९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे भारताचा कोरोना मृत्यूदर १.११ वरून १.१२ टक्क्यांवर गेला आहे. महाराष्ट्रात ७३८ रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक ५४८, तामिळनाडू ३९७ तसेच दिल्लीत २५२ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. देशभरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. मात्र, मृत्यूच्या नोंदी वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आरोग्य मंत्रालयाने कोरोना मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे निर्देश राज्य, केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. दिल्लीत गेल्या २४ तासांमध्ये ३००९ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर ४.७६ टक्क्यांवर आला आहे. गुरुवारी हा दार ५.५० टक्के होता. 

गेल्या २४ तासांमध्ये २ लाख ५९ हजार ५५१ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली. तर ३ लाख ५७ हजार २९५ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी ६० लाख ३१ हजार ९९१ झाली आहे. यातील २ कोटी २७ लाख १२ हजार ७३५ रुग्ण हे कोरोना मुक्त झाले आहेत. ३० लाख २७ हजार ९२५ रुग्णांवर (११.६३%) उपचार सुरू आहेत. देशात आतापर्यंत २ लाख ९१ हजार ३३१ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. शुक्रवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ८७.२५ टक्क्यांवर पोहोचला. गेल्या एका दिवसात सक्रिय कोरोना रुग्णसंख्येत १ लाख १ हजार ९५३ ने घट नोंदवण्यात आली आहे.

गेल्या २४ तासांतील एकूण कोरोनाबाधितांपैकी ७७ टक्के रुग्ण १० राज्यांत आढळले. त्यात तामिळनाडूत सर्वाधिक ३५ हजार ५७९ रुग्णांची भर पडली. केरळ ३०,४९१, महाराष्ट्र २९,९११, कर्नाटक २८,८६९, आंध्र प्रदेश २२,६१०, प. बंगाल १९,०९१, ओडिशा ११,४९८, राजस्थान ७,६८०, उ. प्रदेश ६,६८१ तसेच आसाममध्ये ६ हजार ५७३ रुग्ण नोंदविण्यात आलेत.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या१) कर्नाटक -  ५,३४,९७५२) महाराष्ट्र  -  ३,८५,७८५३) केरळ   - ३,१८,२२०४) तामिळनाडू - २,६३,३९०५) आंध्र प्रदेश  - २,०९,१३४६) राजस्थान -१,४३,९७४७) प. बंगाल - १,३१,५१०८) उ. प्रदेश - १,१६,४३४

लसीकरण! देशात आतापर्यंत १९ कोटी १८ लाख ७९ हजार ५०३ लसीचे डोस लावण्यात आले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये १४ लाख ८२ हजार ७५४ लोकांचे लसीकरण झाले. आतापर्यंत एकूण ३२ कोटी ४४ लाख १७ हजार ८७० तपासण्या करण्यात आल्या आहेत.यातील २० लाख ६१ हजार ६८३ तपासण्या २४ तासात करण्यात आल्यात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या