शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

"देशात दोन प्रकारचे सैन्य असू नये";'अग्निवीर'वरून शहीद कॅप्टनच्या आईचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 11:01 AM

देशात दोन प्रकारचे सैन्य असू नये, अग्निवीर योजना बंद करण्यात यावी, असे शहीद कॅप्टनची आई मंजू सिंह यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर सांगितले.

लखनौ : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी रायबरेली येथे कीर्ती चक्र पुरस्कारप्राप्त शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. देशात दोन प्रकारचे सैन्य असू नये, अग्निवीर योजना बंद करण्यात यावी, असेशहीद कॅप्टनची आई मंजू सिंह यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर सांगितले.

आमचा मुलगा आम्हा सर्वांना असा मध्येच सोडून गेला, याचे आम्हाला प्रचंड दुःख आहे. कुटुंबाला त्यांची गरज होती. मला आयुष्यभर या वेदनासह जगायचे आहे आणि मला माझ्या मुलाची आठवण यावी म्हणून मला आणखी वेदना हव्यात, असे शहीद कॅप्टनची आई मंजू सिंह यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर सांगितले.

एकदिवसीय दौऱ्यात राहुल गांधींनी विविध संघटनांच्या कार्यकत्र्यांची भेट घेतली. राहुल यांनी रायबरेलीतील 'एम्स'ला भेट देत रुग्णांची भेट घेतली. दरम्यान, गांधींनी रायबरेलीतील एका हनुमान मंदिरात प्रार्थनाही केली.

शहिदांच्या कुटुंबांसाठी राहुल काहीतरी करतील

शहीद अंशुमन यांच्या आईने सांगितले की, राहुल गांधी यांच्या भेटीदरम्यान 'अग्निवीर'बाबत चर्चा झाली. दोन प्रकारचे सैन्य असू नये. सरकारने राहुल गांधींचे म्हणणे ऐकून त्यावर विचार करणे अपेक्षित आहे.

राहुल गांधी म्हणाले की, त्यांनी सरकारला अग्निवीर योजना संपवण्याची विनंती केली आहे, ही योजना लष्करासाठी योग्य नाही. देशआमच्यासोबत आहे. मी राहुल गांधींशी इतर शहिदांच्या कुटुंबांबाबत बोलले आहे. कुटुंबांसाठी राहुल गांधी काहीतरी करतील, असे त्या म्हणाल्या

आम्ही सर्वांशी लढू  सैन्य भरतीत अग्निवीर योजना बंद करण्यावर भर देताना मंजू सिंह म्हणाल्या की, आम्ही लष्करी कुटुंबातील आहोत, पक्ष असो किवा विरोधक, आम्ही सर्वांशी लढू आणि हात जोडून आम्ही सरकारला अग्निवीर योजना बंद करण्याची विनंती करतो. केवळ चार वर्षांसाठी सैन्यात भरती होणे योग्य नाही, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानRahul Gandhiराहुल गांधी