शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

बांगलादेशात सत्तापालट, पंतप्रधानांनी देश सोडला, बीएसएफने भारत-बांगलादेश सीमेवर अलर्ट जारी केला; सुरक्षा वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 4:17 PM

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पाहता बीएसएफने भारत-बांगलादेश सीमेवर अलर्ट जारी केला आहे.

गेल्या काही दिवसापासून बांगलादेशात नोकरीतील आरक्षणावरुन निदर्शने सुरू आहेत. काल एका दिवसात निदर्शनात १०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आज परिस्थिती बिघडल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला, असून देशही सोडल्याची माहिती समोर आली आहे. 

बांगलादेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर बीएसएफने भारत-बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट जारी केला आहे. याबाबत बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. बीएसएफचे डीजीही कोलकाता येथे पोहोचले आहेत.

बांगलादेशातील कायदा आणि सुव्यवस्था लष्कराच्या हातात आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सीमा ४,०९६ किलोमीटर लांब आहे. बीएसएफने सर्व सीमेवर अलर्ट जारी केला आहे. बांगलादेशात गेल्या महिनाभराहून अधिक काळ निदर्शने सुरू आहेत.

पंतप्रधान यांनी देश सोडला

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी हिंसक निदर्शनांनंतर राजीनामा दिल्यानंतर राजधानी ढाका येथून आपल्या बहिणीसह सुरक्षित स्थळी रवाना झाल्या आहेत. सुमारे ३०० लोकांचा मृत्यू झालेल्या आरक्षणाच्या निषेधार्थ आंदोलकांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

 जीवाला धोका टाळण्यासाठी शेख हसिना या त्यांच्या बहिणीसाठी हेलिकॉप्टरने त्रिपुराच्या आगरतळा येथे पोहोचल्या आहेत.शेख हसिना यांना व्हिडीओतून देशातील नागरिकांना संदेश द्यायचा होता. मात्र लाखो आंदोलक शेख हसिना यांच्या अधिकृत निवासस्थानाकडे निघाल्यामुळे त्यांना वेळ मिळाला नाही आणि त्यांनी तात्काळ देश सोडला.

बांगलादेशी माध्यमांच्या वृत्तानुसार अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली आहे. यामध्ये अनेकाचा मृत्यू झाला आहे. आंदोलकांनी टांगेल आणि ढाका येथील महत्त्वाचे महामार्ग ताब्यात घेतले आहेत. हसीना यांच्या सरकारच्या विरोधात सुमारे ४ लाख बांगलादेशी लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी दुपारी २.३० वाजता लष्करी हेलिकॉप्टरमधून उड्डाण केले आणि त्या भारतात आल्या असल्याचे म्हटलं जात आहे.

टॅग्स :BangladeshबांगलादेशBSFसीमा सुरक्षा दल