शहरं
Join us  
Trending Stories
1
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
2
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
3
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
4
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
5
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
6
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
7
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
8
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
9
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
10
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
11
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
12
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
13
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
14
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
15
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
16
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
17
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
18
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
19
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
20
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?

बिट्टू बजरंगीला न्यायालयाकडून जामीन मंजूर; नूह येथे हिंसाचार भडकावल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 3:33 PM

यात्रेदरम्यान प्रक्षोभक भाषण दिल्याच्या आरोपावरून पोलिसांनी बिट्टू बजरंगीला त्याच्या फरीदाबाद येथील घरातून अटक केली होती.

नवी दिल्ली: नूह हिंसाचाराचा आरोपी बिट्टू बजरंगी उर्फ ​​राजकुमार याला जामीन मिळाला आहे. बिट्टू बजरंगीला १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी फरिदाबाद येथून अटक करण्यात आली होती. नूह येथील ब्रजमंडल यात्रेदरम्यान बिट्टू बजरंगीने सोशल मीडियावर अनेक प्रक्षोभक पोस्ट केल्याचा आरोप त्याच्यावर आहेत.

यात्रेदरम्यान प्रक्षोभक भाषण दिल्याच्या आरोपावरून पोलिसांनी बिट्टू बजरंगीला त्याच्या फरीदाबाद येथील घरातून अटक केली होती. त्यानंतर त्याला नूह जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले, त्यानंतर आज एडीजे न्यायालयाने बिट्टू बजरंगीला जामीन मंजूर केला.

बजरंग दलाच्या बिट्टू बजरंगीला सीआयए तावडूने नूह हिंसाचार प्रकरणी अटक केली होती. बिट्टू बजरंगीविरुद्ध नूह पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. एएसपी उषा कुंडू यांच्या तक्रारीवरून बिट्टू बजरंगीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नूह हिंसाचार प्रकरणात बिट्टू बजरंगीवर कलम १४८, १४९, ३३२, ३५३, १८६, ३९५, ३९७, ५०६, २५, ५४, ५९ लावण्यात आले होते.

आतापर्यंत ६० एफआयआर, ३०६ अटक

या प्रकरणी आतापर्यंत ६० एफआयआर नोंदवण्यात आले असून त्यापैकी ४९ दंगली आणि ११ सायबर एफआयआर आहेत. याशिवाय नूह हिंसाचारात ३०६ जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी ३०५ जणांना दंगलीत अटक करण्यात आली असून सायबर प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे.

बिट्टू बजरंगीवर काय आरोप?

या प्रकरणी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, बिट्टू आणि त्याच्या समर्थकांनी एएसपी उषा कुंडू यांच्या टीमला तलवार आणि त्रिशूळ घेऊन नल्हार मंदिरात जात असताना अडवले तेव्हा त्यांनी गैरवर्तन केले आणि धमकावले, त्यानंतर सोशल मीडिया पोस्टद्वारे बजरंगीची ओळख पटली.

बिट्टू बजरंगी शस्त्रांबाबत काय म्हणाला?

बिट्टू बजरंगीला विचारले असता, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्रवासी शस्त्रे घेऊन जाताना दिसत आहेत. यावर बजरंगी म्हणाले, 'काही लोकांकडे शस्त्रे होती, मात्र ते सर्व परवानाधारक होते. आणि आपण ज्या तलवारी ठेवतो त्या पूजेसाठी, लग्नसमारंभासाठी, विधींसाठी वापरल्या जातात; त्यांचा वापर हत्येसाठी होत नाही.

काय आहे नूह हिंसा प्रकरण?

दरवर्षीप्रमाणे हरियाणातील नूह येथे हिंदू संघटनांनी ३१ जुलै रोजी बृजमंडल यात्रा काढण्याची घोषणा केली होती. त्यासाठी प्रशासनाकडून परवानगीही घेण्यात आली होती, मात्र ब्रिजमंडल यात्रेदरम्यान दगडफेक करण्यात आली. काही वेळातच त्याचे दोन समुदायांमधील हिंसाचारात रूपांतर झाले. वातावरण इतके तापले की शेकडो गाड्या पेटवण्यात आल्या. सायबर पोलिस स्टेशनवरही हल्ला झाला. गोळीबारही झाला. पोलिसांवरही हल्ले झाले. नुहानंतर सोहना येथेही दगडफेक आणि गोळीबार झाला. वाहने जाळण्यात आली. यानंतर हिंसाचाराची आग नुहपासून फरीदाबाद-गुरुग्रामपर्यंत पसरली.

टॅग्स :HaryanaहरयाणाPoliceपोलिसCourtन्यायालय