शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

राज्यांना 'रॉयल्टी'ची मोठ्ठी खाण! २००५ पासूनचा थकीत कर वसूल करण्याची कोर्टाची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 05:58 IST

केंद्र, खाण कंपन्यांकडून होणार वसुली, कंपन्यांवर ७० हजार कोटी रुपयांचा बोजा

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: केंद्र सरकार व खाण कंपन्या यांच्याकडून खनिजे आणि खनिजयुक्त जमिनीवरील रॉयल्टी आणि कर यांची १ एप्रिल २००५ पासूनची थकबाकी वसूल करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना बुधवारी दिली. ही वसुली १२ वर्षांत टप्प्या-टप्प्याने होणार आहे. सरन्यायाधीश (सीजेआय) डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील ९ सदस्यीय न्यायपीठाने हा निर्णय दिला. हा निर्णय देणाऱ्या न्यायपीठात न्या. ऋषिकेश रॉय, न्या. अभय एस. ओका, न्या. बी. व्ही. नागरत्ना, न्या. जे. बी. पारदीवाला, न्या. मनोज मिश्रा, न्या. उज्जल भूइयां, न्या. सतीशचंद्र शर्मा आणि न्या. ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांचा समावेश आहे.

खाणी आणि खनिजयुक्त जमिनीवर कर लावण्याचा वैधानिक अधिकार राज्य सरकारांनाच आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने २५ जुलै रोजी दिला होता. या निर्णयाची अंमलबजावणी 'पूर्वलक्षी प्रभावा'ने न करता 'आगामी प्रभावाने करावी, अशी विनंती केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आली होती. ती फेटाळण्यात आली.

१९८९ पासूनची रॉयल्टी व कर आपल्याला मिळावा, अशी मागणी राज्य सरकारांच्या वतीने करण्यात आली होती. त्या संदर्भात केंद्राने म्हटले होते की, अशा प्रकारे वसुली झाल्यास सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांवर ७० हजार कोटी रुपयांचा बोजा पडेल. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी आगामी प्रभावाने करण्यात यावी. तथापि, ती न्यायालयाने फेटाळली. काही अटी घालून न्यायालयाने १ एप्रिल २००५ पासूनची रॉयल्टी व कर वसूल करण्याची परवानगी राज्य सरकारांना दिली.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकार