शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

Corona Virus : कोरोनाचा कहर! दिल्ली-मुंबईत धोक्याची घंटा; रुग्णांमध्ये दिसलं 'हे' नवं लक्षण, 10 दिवस महत्त्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 10:38 AM

Corona Virus : महाराष्ट्र आणि दिल्लीतील परिस्थिती चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे.

कोविड-19 व्हायरसचा संसर्ग भारतात पुन्हा वेगाने पसरू लागला आहे. याबाबत महाराष्ट्र आणि दिल्लीतील परिस्थिती चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आरोग्य विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, पुढील 10-12 दिवस कोरोना व्हायरसच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. या काळात कोरोनाचा संसर्ग शिगेला पोहोचू शकतो, त्यानंतर तो कमी होईल. XBB.1.16 व्हेरिएंटला कोरोना प्रकरणांमध्ये आताच्या वाढीचे कारण सांगितले जात आहे, जे वेगळे लक्षण दर्शवत आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, अधिकृत सूत्रांनी सांगितले की, कोविड-19 ची प्रकरणे वाढत असली तरी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे आणि ते कमी राहण्याची अपेक्षा आहे. ते म्हणाले की कोरोना प्रकरणांमध्ये सध्याची वाढ XBB.1.16 मुळे आहे जी ओमायक्रॉनचे सबव्हेरिएंट आहे. रुग्णालयात दाखल किंवा मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

रुग्णांमध्ये दिसतंय 'हे' नवं लक्षण

मार्चच्या शेवटी WHO ने XBB.1.16 ला 'निरीक्षण अंतर्गत व्हेरिएंट' म्हणून घोषित केले आणि असे म्हटले की हे आतापर्यंतचा सर्वात वेगाने पसरणारा प्रकार आहे. या प्रकाराची लागण झालेल्या लोकांमध्ये खूप ताप आणि खोकला याशिवाय आणखी एक लक्षण दिसून येत आहे. यामध्ये रुग्णांना कंजंक्टिवाइटिसचा त्रास ज्याला सामान्यत: डोळे येणे असं म्हणतात. 

हिंदुस्तान टाईम्सच्या अहवालात नेब्रास्का मेडिसिनच्या ट्रुहलसेन आय इन्स्टिट्यूटच्या संशोधकांचा हवाला देऊन म्हटले आहे की संक्रमित लोकांच्या अश्रूंमध्ये एक व्हायरस आढळला आहे, ज्यामुळे कंजंक्टिवाइटिस होऊ शकतो. संस्थेच्या म्हणण्यानुसार, डोळे लाल होणे आणि पाणी येणे, सूज, वेदना किंवा जळजळ, खाज येणे यांचा समावेश आहे.

दिल्लीत धोक्याची घंटा

बुधवारी दिल्लीत कोरोना संसर्गाचे 1,149 नवीन रुग्ण आढळले. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, या कालावधीत संसर्गाचे प्रमाण 23.8 टक्के होते, याचा अर्थ चाचणी केलेल्या प्रत्येक 100 लोकांपैकी 23 पेक्षा जास्त लोकांना कोविडची लागण झाल्याचे आढळून आले. विभागाच्या बुलेटिननुसार, या 24 तासांमध्ये राष्ट्रीय राजधानीत कोविड-19 च्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तथापि, रुग्णाच्या मृत्यूचे प्राथमिक कारण कोविड-19 नसल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्रातही हजारांहून अधिक रुग्ण, 9 जणांचा मृत्यू 

गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोविड संसर्गाचे 1,115 नवीन रुग्ण आढळले आहेत. याचदरम्यान 9 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. सरकारने जारी केलेल्या ताज्या बुलेटिननुसार, राज्याची राजधानी मुंबईत 320 नवीन प्रकरणे आणि 2 मृत्यूची नोंद झाली आहे. येथे पॉझिटिव्हिटी रेट 14.57% नोंदवला गेला.

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसdelhiदिल्लीMaharashtraमहाराष्ट्र