शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
2
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
4
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
5
शनी मार्गी: ७ राशींची दिवाळीनंतरही दिवाळी, व्यवसायात नफा; उधारी वसूल होईल, बँक बॅलन्स वाढेल!
6
पुण्यातील त्रिकुटाला दिली होती बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी; पैशांच्या वादातून नाकारले काम
7
सरकारी निर्णयांवर आयोगाचा असेल ‘वॉच’; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती
8
विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी
9
फक्त विक्री आणि विक्री... शेअर बाजाराला कोणाची नजर लागली; कोरोनानंतर मोठी निराशा, काय आहे इशारा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : पाच वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीत ४ कोटींची वाढ
11
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
12
आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांचे महायुतीविरुद्ध आंदोलन; प्रचार करणार की नाही?
13
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
14
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
15
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
16
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
17
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
18
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
19
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
20
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या

मध्य प्रदेशात केरळची पुनरावृत्ती; स्फोटकमिश्रित खाद्य दिल्यानं गाय गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 11:24 PM

पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद; आरोपीला त्वरित पकडण्याची संघटनेची मागणी; तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

उमरिया : मध्यप्रदेशातील उमरिया जिल्ह्यात अज्ञात आरोपींनी एका गायीला स्फोटकमिश्रित खाद्य खाऊ घातल्याने ही गाय गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी मालकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. केरळात स्फोटक घातलेले अननस खाल्ल्याने एका हत्तिणीचा मृत्यू झाल्याची घटना अलीकडेच घडली होती. त्यावरून देशभरात गदारोळही उठला होता. या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशातील घटनाही संवेदनशील समजली जात आहे.मध्यप्रदेशच्या उमरिया जिल्ह्यातील गिंजरी गावात ही घटना घडली. गायीचे मालक ओमप्रकाश अग्रवाल यांनी सांगितले की, आम्ही रोज सकाळी गाय चरायला सोडून द्यायचो. घराच्या आसपास ५00 मीटरच्या परिसरात ती चरून संध्याकाळी घरी येत असे. तथापि, १४ जून रोजी ती परत आली नाही. आम्ही दोन दिवस तिचा शोध घेतला. १६ जूनला ती आम्हाला जखमी अवस्थेत सापडली. तिचा खालचा जबडा फाटलेला आहे. गायीला स्फोटकमिश्रिम खाद्य खायला दिल्यामुळे तिचा जबडा फाटला असावा, असा मला संशय आहे. गाय आता काहीही खाईनाशी झाली आहे. तिला एक महिन्याचे वासरू असून] त्याला दूध मिळेनासे झाले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन शर्मा यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले की, पाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाय जखमी झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पशुवैद्यकाला बोलावून गायीवर उपचार केले. शर्मा यांनी सांगितले की, याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपास सुरू आहे. आरोपींचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गायीला जखमी करणाऱ्या व्यक्तीला तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. आरोपींना अटक न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे. बजरंग दलाचे नेते उपेंद्र सिंग यांनी म्हटले की, याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक न केल्यास आम्हीच त्यांना शोधू. जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळातील पलक्कड जिल्ह्यात स्फोटकांनी भरलेले अननस खाल्ल्याने एका गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाला होता. केरळनंतर अशाच प्रकारच्या एका घटनेत हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यात एका गर्भवती गायीचा मृत्यू झाला होता. अशा प्रकारची तिसरी घटना आता मध्यप्रदेशात घडली आहे.पोलिसांनी सांगितले की, आरोपी स्थानिक असावा, असा संशय आहे. त्यानुसार तपास केला जात आहे. काही गोपनीय पथके तपासकामी लावण्यात आली आहेत. आरोपी लवकरात लवकर पकडले जातील. दरम्यान, या प्रकरणी केरळातील घटनेप्रमाणे असंतोष पसरू नये, यासाठी राज्य सरकार सतर्क आहे.छत्तीसगढमधील हत्तीच्या मृत्यूप्रकरणी पाच जण अटकेत; तीन वीज कर्मचाऱ्यांचा समावेशरायपूर : छत्तीसगढच्या रायपूर जिल्ह्यात विजेचा धक्का लागून झालेल्या हत्तीच्या मृत्यूप्रकरणी वीज विभागाच्या तीन कर्मचाºयांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.राज्याच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले की, रायगढ जिल्ह्यातील धरमजयगढ वनमंडळातील गेरसा गावात ही घटना घडली होती. या प्रकरणातील दोन आरोपी शेतकरी आहेत. भादोराम आणि अन्य एक शेतकरी यांना अटक करून तुरुंगात पाठविण्यात आले आहे. या शेतकºयांना कृषिपंपासाठी बेकायदेशीररीत्या वीज जोडणी देणे आणि पुरावे नष्ट करणे या आरोपाखाली वीज विभागातील उपअभियंता पी. कुजूर, लाईनमन अमृतलाल आणि एक सहायक, अशा तिघांना अटक करण्यात आली आहे.राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक राकेश चतुर्वेदी यांनी सांगितले की, धरमजयगढ वनमंडळातील गेरसा बीटमध्ये मंगळवारी सकाळी एका हत्तीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. वनअधिकारी घटनास्थळी दाखल झाले तेव्हा त्यांना असे आढळून आले की, भादोराम आणि अन्य एका शेतकºयाने कृषिपंपासाठी जवळच्या एका विजेच्या खांबावरून अवैधरीत्या तार टाकून वीज घेतली होती. त्याचा धक्का लागून हत्तीचा मृत्यू झाला.विलासपूरचे मुख्य वनसंरक्षक अनिल सोनी आणि धरमजयगढचे वनमंडळ अधिकारी प्रियंका पांडेय यांनी दोन्ही शेतकºयांची चौकशी केली. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध वन्यजीव अधिनियमांतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याचवेळी विद्युत विभागाचे उपअभियंता पी. कुजूर आणि अन्य कर्मचारी विजेच्या खांबावरून अवैधरीत्या घेण्यात आलेल्या तारा काढीत असल्याचे आढळून आले. या उपअभियंत्यासह दोन विद्युत कर्मचाºयांवर पुरावे नष्ट केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.आठवडाभरात पाच हत्ती मृत्युमुखीदरम्यान, छत्तीसगढमध्ये मागील आठवडाभरात पाच हत्ती मृत्युमुखी पडले आहेत. यात एका पिलाचा समावेश आहे. सरगुजा विभागात पाच दिवसांत तीन हत्तींचे मृतदेह सापडले होते. त्यानंतर काल रायगढमध्ये एका हत्तीचा मृतदेह आढळून आला आहे, तसेच धमतरीमध्ये हत्तीचे एक पिलू मरण पावले.एका वरिष्ठ वनाधिकाºयाने सांगितले की, सोमवारी धमतरी जिल्ह्यातील मदमसिल्ली भागात हत्तीचा कळप जात असताना त्यातील एक पिलू दलदलीत फसले. हत्तीच्या कळपाने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. वन विभागाच्या कर्मचाºयांनीही त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. तथापि, ते वाचू शकले नाही.मानव हत्ती संघर्ष; पाच वर्षांत ३२५ माणसे ठारछत्तीसगढमध्ये मानव आणि हत्ती यांच्यात सातत्याने संघर्ष होत असतो. त्यात हत्तीप्रमाणेच माणसेही मोठ्या संख्येने मारली जातात.राज्य सरकारच्या अंदाजानुसार, मागील पाच वर्षांत मानव-हत्ती संघर्षात ३२५ माणसे आणि ७0 हत्ती मारले गेले आहेत.यातील बहुतांश लोक मस्तवाल हत्तीच्या हल्ल्यांत मरण पावले आहेत, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश