शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

गाय आमची माता, तिच्या सुरक्षेसाठी गोसुरक्षा विधेयक आणणार- आसामचे मुख्यमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 15:36 IST

भाजप सरकार लवकरच गोवंश हत्येविरोधात कायदा आणणार

गुवाहाटी: राज्य सरकार गायींच्या सुरक्षेसाठी संविधानाच्या चौकटीत राहून आवश्यक पावलं उचलेल, असं आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी सांगितलं. आसाममध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं सत्ता राखली. यानंतर झालेल्या विधिमंडळाच्या पहिल्याच अधिवेशनात मुख्यमंत्री सर्मा यांनी गोसुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. तत्पूर्वी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल जगदीश मुखी यांनी त्यांच्या भाषणात गोसुरक्षेची गरज व्यक्त केली.गाय आमची आमची माता आहे. आम्ही पश्चिम बंगालहून गायींची तस्करी होऊ देणार नाही. जिथे गायींची पूजा केली जाते, तिथे गोमासाचं सेवन व्हायला नको, असं आसामचे मुख्यमंत्री सर्मा म्हणाले. 'गोसंरक्षण व्हावं ही आमची भूमिका आहे. मात्र याचा अर्थ सगळ्यांनी त्यांच्या सवयी अचानक बदलाव्यात असं अजिबात नाही. फॅन्सी बाजार, शांतीपूर, गांधीवस्ती या गुवाहाटीतील ठिकाणी मदिना हॉटेलची (जिथे गोमांस मिळतं ती हॉटेल्स) गरज नाही. कारण इथले लोक याबद्दल संवेदनशील आहेत,' असं सर्मा म्हणाले.'ज्या भागात गोमांसाबद्दल संवेदनशीलता नाही, तिथे बदल करण्याची आवश्यकता नाही. आपली घटनादेखील गोहत्येच्या विरोधात आहे. त्यामुळे संविधानाच्या चौकटीत राहून त्यानुसार गोहत्या रोखायला हव्यात. राज्यातील गायींचा अवैध व्यापार रोखायला हवा,' असं मत सर्मा यांनी व्यक्त केलं. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेला पक्षाच्या बहुतांश आमदारांनी पाठिंबा दर्शवला आहे.

टॅग्स :AssamआसामBJPभाजपा