शहरं
Join us  
Trending Stories
1
ST कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता पगार दरमहा ७ तारखेला होणार; ‌प्रताप सरनाईकांची घोषणा
2
लढाऊ विमानातून सोडला की विमानासारखाच शेकडो किमीवरून उडत उडत येतो बॉम्ब; DRDO ने बेटावर डागला
3
"उदयनराजे, लोकसभेच्या खासदाराला शोभेल असं बोला"; महात्मा फुले यांच्या संदर्भातील विधानावरून लक्ष्मण हाकेंचा निशाणा
4
रुग्णाला काय अमृत पाजले का? ६ लाखांच्या बिलावरून आमदार बांगरांनी डॉक्टरला फटकारले
5
Heatwave: बुलढाण्यात उष्मघातामुळे १२ वर्षीय मुलाचा मृत्यू, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर!
6
२६/११चा लढा ते राणा प्रत्यार्पण, मराठी अधिकाऱ्याची कमाल कामगिरी; युद्धही जिंकले अन् तहही...
7
"मी मूर्खांना उत्तरे देत नाही"; CM फडणवीसांच्या विधानावर राऊत म्हणाले, एवढे चिडता कशाला?
8
अमेरिकेला समुद्रात चकवा दिला, आता बंदीच घातली; जुगविंदर सिंह ब्रार कोण आहेत?
9
टेरिफ वॉर अमेरिकेचे, कोकणातल्या मच्छीमारांना फटका बसला, तो कसा काय? तुम्हाला हे कनेक्शन माहितीच नसेल...
10
Prashant Koratkar: प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून सुटका, पोलिस संरक्षणात बाहेर काढले -video
11
"प्रत्येक गावात ८-१० लोक मरू द्या, बस पेटवा"; वक्फला विरोध करणाऱ्यांना काँग्रेस नेत्याने भडकवले
12
पोलीस ठाण्यातच रंगला 'प्रेमाचा' आखाडा, एका तरुणावरून दोन तरुणी भिडल्या; कहाणी वाचून चक्रावून जाल
13
कोल्हापूरच्या धनंजय पोवारला हिंदी सिनेमाची लॉटरी, 'या' लोकप्रिय अभिनेत्यासोबत करणार काम
14
“दीनानाथ प्रकरणी SIT चौकशी करा, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”: हर्षवर्धन सपकाळ
15
शनि काय, कोणतेच संकट येऊ देत नाहीत हनुमंत; ‘या’ ४ राशी आहेत अत्यंत प्रिय, अपार कृपा लाभते!
16
टॅरिफ स्थगितीनंतर गुंतवणूकदारांची चांदी! सेन्सेक्स १३०० अंकांनी वर, 'या' २ सेक्टरमध्ये सर्वाधिक वाढ
17
चोर तर चोर..वरून शिरजोर! जेवणाबद्दल जाब विचारणाऱ्या रेल्वे प्रवाशाला कँटीन कर्मचाऱ्यांकडून मारहाण
18
Krrish 4: 'क्रिश ४'मध्ये जादूची एन्ट्री! हृतिक रोशनसोबत मुख्य भूमिकेत दिसणार 'ही' अभिनेत्री, सिनेमा कधी होणार प्रदर्शित?
19
"मी चुकीचं केलं.." जया बच्चन यांनी 'टॉयलेट एक प्रेमकथावर' केलेल्या टीकेवर अक्षय कुमारचं उत्तर
20
"मोठं नाव, खूप फॅन्स आहेत म्हणून..."; रोहितच्या निवृत्तीच्या चर्चांदरम्यान क्रिकेटरचं विधान

तिरुपतीमधल्या गोशाळेत शेकडो गायींचा मृत्यू; खळबळजनक दाव्यानंतर संस्थानाचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 19:00 IST

तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या गोशाळेत मोठ्या प्रमाणात गायींचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Tirumala Tirupati Devasthanams: काही महिन्यांपूर्वी आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती मंदिर प्रसादामध्ये मिळणाऱ्या लाडूमुळे वादाच्या भोवऱ्यात आढळलं होतं. प्रसादामध्ये दिल्या जाणाऱ्या लाडूमध्ये चरबी आढळून आल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर आता तिरुपती येथील गोशाळेबाबत वायएसआरसीपी नेत्याने मोठा दावा केला आहे. तिरुपती येथील गोशाळेत गायींचा मृत्यू होत असून तीन महिन्यांमध्ये १०० गायी मृत्यूमुखी पडल्याचा दावा वायएसआरसीपीच्या नेत्याने केला आहे. मात्र तिरुपती संस्थानने आणि आंध्र प्रदेश सरकारने हा दावा फेटाळून लावत ही बातमी खोटी असल्याचे म्हटलं आहे.

तिरुपती येथील तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या गोशाळेत मोठ्या प्रमाणाता गायी मृत्युमुखी पडल्याचा दावा करण्यात आला आहे. टीटीडीचे माजी अध्यक्ष आणि वायएसआरसीपी नेते भूमना करुणाकर रेड्डी यांनी आंध्र प्रदेश सरकारवर या प्रकरणी गंभीर आरोप केला. लोकांना खरी गोष्ट कळावी आणि तिरुमलाचे पावित्र्य राखले जावे यासाठी भूमना करुणाकर रेड्डी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

"गेल्या तीन महिन्यांत १०० हून अधिक गायींचा योग्य काळजी न घेतल्यामुळे मृत्यू झाला आहे. ही संख्या आणखी वाढू शकते, कारण माझ्यापर्यंत एवढीच माहिती समोर आली आहे. हे लोक आमचे नेते वायएस जगन मोहन रेड्डी यांच्यावर खोटे आरोप करण्यात आणि त्यांची चांगली कामे पुसून टाकण्याचा प्रयत्नात आहेत," असे भूमना करुणाकर रेड्डी म्हणाले.

"आम्हाला इतक्या गायींच्या मृत्यूची आणि गोशाळेतील खराब व्यवस्थेची चौकशी करुन हवी आहे. या गोशाळेची देखभाल जिल्हा वनाधिकारी करतात, ज्यांना पशुवैद्यकीय शास्त्राचे कोणतेही ज्ञान नाही. भाजप-टीडीपीचे सरकार आणि टीटीडी प्रशासकीय मंडळाचा हा निष्काळजीपणा आहे. इतक्या गायींचे अचानक मृत्यू हे जगन मोहन रेड्डी यांच्यावर निराधार आरोप करणाऱ्या सध्याच्या सरकारविरुद्ध एक दैवी संकेत आहे," असंही विधान रेड्डी यांनी केले.

रेल्वे ट्रॅकवर एक गर्भवती गाय मृतावस्थेत आढळली होती आणि अधिकाऱ्यांनी तिचे कान कापले, ज्यावर टीटीडीचा टॅग होता, असाही दावा भूमना करुणाकर रेड्डी यांनी केला. टीटीडी आणि गौशाळेचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न वायएस राजशेखर रेड्डी आणि वायएस जगन मोहन रेड्डी यांनी केला होता असेही रेड्डी यांनी सांगितले.

या आरोपांना उत्तर म्हणून, तिरुमला तिरुपती देवस्थानमने शुक्रवारी एक अधिकृत निवेदन जारी केले. यामध्ये भूमना रेड्डी यांनी केलेल्या दाव्यांचे खंडन करण्यात आले आहे. या खोट्या बातम्या असून त्यांच्यावर विश्वास ठेवू नका असे यात म्हटलं आहे. "टीटीडी गोशाळेत  गायींचा मृत्यू झाल्याचा सोशल मीडियावर पसरवलेला दावा खरा नाही. मृत गायींचे फोटो टीटीडी गोशाळेशी संबंधित नाहीत. मृत्युमुखी पडलेल्या गायींचे फोटो दाखवून भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. याचा  टीटीडी निषेध करते," असे निवेदनामध्ये म्हटलं आहे. 

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटAndhra Pradeshआंध्र प्रदेश