शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
3
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
4
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
5
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
6
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
7
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
8
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
9
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
10
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
11
दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!
12
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
13
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
14
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
15
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!
16
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
17
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
18
सेमीकंडक्टर उद्योग राखेल समतोल; जगातील सत्तांना उद्देशून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन
19
ॲडव्हान्स व्होटिंग आणि ८.५ कोटींचं आमिष!
20
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले

Crime News: बाप रे... रातोरात 60 फूट लांब पूल चोरीला, अभियंत्याची पोलिसात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 10:01 AM

भल्या-मोठ्या पुलाची चोरी झाल्याची घटना घडल्याने प्रशासनाने ही बाब गंभीरतेने घेत संबंधित विभागाच्या अभियंत्यास पोलिसात चोरीची तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे

रोहतास - बिहारच्या रोहतास जिल्ह्याच्या नासरीगंज तालुक्यातील आमियावर स्थित एक लोखंडी पुलच रातोरात गायब झाला आहे. 60 फूट लांब, 10 फूट चौरस आणि 12 फूट उंच असलेला हा पूल अज्ञाताने जेसीबीच्या सहाय्याने पळवून नेला आहे. सोमवारी रात्री जेसीबीच्या सहाय्याने येथील लोखंडी पूल काढून वाहनातून पळवून नेण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या चोरीची प्रशासन आणि जलसंधारण विभागाला भनकही लागली नाही. 

भल्या-मोठ्या पुलाची चोरी झाल्याची घटना घडल्याने प्रशासनाने ही बाब गंभीरतेने घेत संबंधित विभागाच्या अभियंत्यास पोलिसात चोरीची तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोन नहर परिमंडळातील आमियावर स्थित एका प्रमुख बंधाऱ्यावर असलेल्या काँक्रिटला समांतर एक जुना पुला होता. विशेष म्हणजे हा पुल 25 वर्षे जुना असल्याचे सांगण्यात येते. मात्र, हा लोखंडी पूलच गायब झाला आहे. यापूर्वीही पुलाच्या काही भागाचे लोखंड अनेकांनी पिकअप वाहनातून पळवले होते. 

सोमवारी जेसीबीच्या सहाय्याने हा पुल उखाडण्यात आला. त्यावेळी, हा पुल कोणाच्या आदेशाने काढण्यात येत असल्याची विचारणा ग्रामस्थांनी केली होती. त्यावेळी, जेसीबी चालकांनी आपण जलसंधारण विभागाचं काम करत असल्याचं सांगितलं. आत्तापर्यंत या पुलातून अंदाजे 20 टनापेक्षा अधिक लोखंड काढण्यात आलं आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बंधाऱ्याच्या निर्मित्तीअगोदर नावेतून गावातील लोक ये-जा होत होती. सन 1966 मध्ये प्रवाशांना घेऊन जाणारी नाव पलटी होवून अपघात झाला. त्यानंतर, सन 1972 ते 75 या कालावधीत तत्कालीन सरकारने हा पूल बांधला होता. मात्र, हा पुल कमकवूत झाल्यानंतर यास समांतर सीमेंट काँक्रिटचा पूल बांधण्यात आला. त्यामुळे, या पुलावरुन वाहतूक कमी झाली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारPoliceपोलिस