शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
6
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
7
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
8
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
9
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
10
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
11
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
12
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
13
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
14
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
15
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
16
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
18
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
19
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
20
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट

दारुबंदीमुळे बिहारमधील गुन्हेगारी दर 27 टक्क्यांनी घसरला

By admin | Published: April 28, 2016 12:31 PM

बिहारमध्ये करण्यात आलेल्या दारुबंदीमुळे गुन्हेगारी दर 27 टक्क्यांनी घसरला आहे, तर सोबतच अपघातांच प्रमाणही कमी झालं आहे

ऑनलाइन लोकमत - 
पाटणा, दि. 28 - बिहारमध्ये करण्यात आलेल्या दारुबंदीमुळे गुन्हेगारी दर 27 टक्क्यांनी घसरला आहे. तर सोबतच अपघातांच प्रमाणही कमी झालं आहे. गेल्या 20 दिवसांत समोर आलेल्या आकडेवारीच्या आधारे अधिका-यांनी ही माहिती दिली आहे. 5 एप्रिलपासून राज्यात दारुबंदी लागू करण्यात आली. राज्यात लागू करण्यात आलेल्या दारुबंदीचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. 
 
गुन्हेगारी दर 27 टक्क्यांनी घसरला असून रस्ते अपघाताचं प्रमाण 33 टक्क्यांनी कमी झालं आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबतच पार पडलेल्या बैठकीत ही अधिकृत आकडेवारी मांडण्यात आली. आकडेवारीनुसार गतवर्षी 1 एप्रिल ते 23 एप्रिलदरम्यान गुन्हेगारीच्या 3178 घटनांची नोंद झाली होती. मात्र दारुबंदी लागू करण्यात आल्यापासून हा गुन्हेगारी दर घसरला असून यावर्षी 2528 घटनांची नोंद झाली आहे. 
 
धार्मिक कार्यक्रमांमध्ये होणा-या दंगलींच्या घटनांचं प्रमाणही कमी झालं आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दारुबंदी पूर्णपणे लागू राहील याची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. तसंच जे अधिकारी निष्काळजीपणा करतील त्यांच्यावर कारवाई करण्यासही सांगितलं आहे. निवडणुकीआधी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सत्तेत आल्यास पुर्णपणे दारुबंदी करण्याचं आश्वासन दिलं होतं. दारुबंदीमुळे सरकारला वार्षिक 4 हजार कोटी महसूलाच नुकसान होत आहे.