शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

गुन्हेगारी, दहशतवादावर ऋषीमुनींचे वेदच एकमेव उपाय : सत्यपाल सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 10:12 IST

आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलनाला राष्ट्रपती रामनाथ कोविंदही उपस्थित होते. 

नवी दिल्ली : देशातील गुन्हेगारी, दहशतवाद आणि जेवढ्या समस्या आहेत, त्यांच्या उच्चाटनासाठी काही उपाय असेल तर ऋषीमुनींचे वेद हाच आहे. देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री आपल्या हातामध्ये वेद घेऊन शपथ घेतील, असे स्वप्न मला पडत असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी केले. महत्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलनाला राष्ट्रपती रामनाथ कोविंदही उपस्थित होते. 

दिल्लीमध्ये आज आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलनाला सुरुवात झाली. यावेळी प्रथम राष्टपती रामनाथ कोविंद यांनी संबोधित केले. हा थंडीचा काळ आहे. दिल्लीमध्ये प्रदूषणामुळे श्वास गुदमरत आहे. सामाजिक संस्थांनी लोकांमध्ये सणांवेळी फटाके न जाळता शांततेत सण साजरा करण्यासाठी जनजागृती करावी असे आवाहन केले. 

यानंतर केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी भाषणावेळी वेदांची महती सांगताना केलेल्या विधानांमुळे वाद ओढवण्याची चिन्हे आहेत. देशात जेवढेकाही गुन्हे घडतात, दहशतवाद, समस्या आहेत, त्यांच्यावर एकमेव वेदच उपाय ठरणार आहेत. देशाला पुन्हा गौरवशाली व्हायचे असेल तर पुन्हा वेदच उपयोगी येतील असे सिंह यांनी सांगितले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतो तेव्हा तो बायबल या पवित्र ग्रंथ हातात घेतो. भारतातही राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री वेद हातात घेऊन शपथ घेतील, असे मी स्वप्न पाहत असल्याचे सिंह यांनी वक्तव्य केले. 

 

टॅग्स :Satyapal Singhसत्यपाल सिंगRamnath Kovindरामनाथ कोविंद