शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

सरकारवर टीका करा, पण मातृभूमीचा अवमान नको - रिजिजू

By admin | Published: February 27, 2017 7:37 PM

राजमस महाविद्यालयात झालेला गोंधळ आणि गुरमेहर कौर विवादावरून केंद्र सरकार आणि विरोधी पक्षामध्ये विवाद वाढत चालला आहे

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 27 - राजमस महाविद्यालयात झालेला गोंधळ  आणि गुरमेहर कौर विवादावरून केंद्र सरकार आणि विरोधी पक्षामध्ये विवाद वाढत चालला आहे. एकीकडे काँग्रेसने या घटनेसाठी संघ आणि मोदी सरकारला जबाबदार धरले आहे. तर  अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर देशविरोधी घोषणाबाजी करणे अयोग्य असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.  
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे विद्यापीठांच्या आवारात देशविरोधी घोषणाबाजी करण्याचा परवाना नव्हे. विरोधकांनी सरकारवर टीका करावी, पण मातृभूमीला शिविगाळ करू नये, असे ट्विट केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केले आहे. तर भय आणि अत्याचाराविरोधात आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत. असहिष्णुता आणि अन्यायाविरोधात उठलेल्या प्रत्येक आवाजात गुरमोहर कौर असेल, असे ट्विट करत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आहे. 
दरम्यान, "केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनीही या विवादावरून विरोधकांना टोला लगावला आहे. "काही व्यक्ती विद्यापीठांना फुटिरतावादाच्या प्रयोगशाळा बनवू इच्छित आहेत. येथे विरोधाचे स्वागत आहे, पण फुटिरतावाद खपवून घेतला जाणार नाही," असे त्यांनी सांगितले. तर काँग्रेस आणि आपने गुरमोहर कौरला मिळालेल्या धमक्यांवरून भाजपाला खडेबोल सुनावले आहेत. या विवादात उडी घेताना वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानची बाजू घेणाऱ्यांना खडेबोल सुनावले होते.