शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारचा मोठा निर्णय; 'वन नेशन वन इलेक्शन' प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी
2
"बाळासाहेब असते, तर तुम्हाला उलटे टांगले असते", बोरनारेंचा उद्धव ठाकरेंवर वार
3
जगातील अनेक देशांमध्ये 'वन नेशन वन इलेक्शन'चा फॉर्म्युला लागू, अशी आहे प्रक्रिया...
4
रोहित शर्माची मुलाखत घेताना पहिला प्रश्न कुठला विचारशील? विराट कोहलीने दिलं मजेशीर उत्तर
5
५०० रुपयांत गॅस सिलिंडर, मोफत उपचार... हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध, कोणासाठी काय-काय?
6
Bigg Boss Marathi Season 5: निक्कीसोबत मैत्री? वैभव चव्हाण म्हणाला, 'तोंडावर सांगतो तिच्याशी माझी कधीच..."
7
राज्याला महिला CM मिळेल? सुप्रिया सुळे-रश्मी ठाकरेंचे नाव चर्चेत? काँग्रेस खासदार म्हणतात...
8
“राहुल गांधींच्या जीवाला धोका, रणनीती आखली जाते, केंद्रीय गृहमंत्री...”; राऊतांचा मोठा आरोप
9
राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्ये; काँग्रेस आरपारच्या भूमिकेत, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले
10
४ वर्ष IPL च्या मैदानात! बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची क्रिकेटमधून बंपर कमाई
11
Vastu Shastra: मीठ मोहरीने केवळ व्यक्तीचीच नाही तर वास्तुचीही दृष्ट काढता येते; वाचा वास्तु टिप्स!
12
BSEच्या शेअरमध्ये 'बुल रन'; दिवसभरात १५% पेक्षा अधिक वाढ; NSE IPO शी काय आहे कनेक्शन?
13
...अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल
14
IND vs BAN : ड्रॉप नाही करत म्हणत गंभीरनं या दोघांना बसवलं बाकावर
15
राजकीय स्टेटमेंट करणार नाही असे म्हणत जरांगेंचे पुन्हा फडणवीसांवर आरोप; काय म्हणाले...
16
रुग्णांकडून एक रुपया जास्त घेतली फी, भाजप आमदार झाले संतप्त; कर्मचाऱ्याची गेली नोकरी
17
Ricky Ponting प्रीती झिंटाच्या PBKS संघाच्या ताफ्यात; मिळाली ही मोठी जबाबदारी
18
"...तर फडणवीस मुख्यमंत्री होतील"; महाजनांच्या विधानावर शिंदे गट म्हणतो, "आम्ही वाद घालणार नाही, पण..."
19
नरहरी झिरवळांविरोधात शिंदेंच्या माजी आमदारानेच थोपटले दंड, दिंडोरीतून देणार आव्हान!
20
सुखी, समाधानी, समृद्ध जीवन हवे? पाहा, स्वामी समर्थ अन् शंकर महाराजांची प्रभावी वचने

पीक, महागाई...! यंदाचा पाऊस थांबता थांबणार नाही; हवामान देतेय विचित्र संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 8:24 PM

हवामान विभागाच्या तज्ञांनुसार कमी दाबाचा पट्टा बनला आहे. यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला विलंब होणार असून यामुळे शेतीचे नुकसान होणार आहे.

यंदा ऑगस्ट संपत आला तरी अनेक भागात रिमझिम नाही तर मुसळधार पाऊस पडत आहे. आधी केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, दिल्लीमध्ये पुराचा कहर केल्यानंतर आता गुजरात, राजस्थानमध्ये पावसाने हाहाकार माजविलेला आहे. काही केल्या हा पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीय. अशातच आता पाऊस सप्टेंबर नाही तर पार ऑक्टोबरपर्यंत पडतच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

हवामान विभागाच्या तज्ञांनुसार कमी दाबाचा पट्टा बनला आहे. यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला विलंब होणार असून यामुळे शेतीचे नुकसान होणार आहे. मान्सून परतण्यास सप्टेंबर अखेर किंवा त्यापेक्षाही पुढे सुरुवात होऊ शकते. भात, कापूस, सोयाबीन, मका, डाळी आदीचे उत्पादन सप्टेंबरअखेर घेतले जाते. यामुळे जर ऑक्टोबरमध्ये पाऊस झाला तर शेतीचे मोठे नुकसान होणार असल्याचा अंदाज आहे. 

पुढील पीक थंडीत पेरले गेले तर त्याचा फायदा पिकाला होणार आहे. कारण जमिनीमध्ये ओलावा राहणार असून गहू, चण्यासारख्या पिकाला याचा फायदा होणार आहे. हवामान विभागाच्या एका वरिष्ठ संशोधकाने रॉयटरला याची माहिती दिली आहे. 

सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात कमी दाबाची प्रणाली तयार होण्याची शक्यता आहे. साधारणपणे जूनमध्ये पाऊस सुरु होऊन तो १७ सप्टेंबरपर्यंत संपतो. परंतू यंदा तो ऑक्टोबर मध्य गाठणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गहू, साखर आणि तांदूळ उत्पादनात भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. या हवामानामुळे शेतमालाच्या निर्यातीत अडचणी येणार आहेत.

जूनच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण देशात सात टक्के अधिक पाऊस होता. काही राज्यांमध्ये सरासरीपेक्षा सरासरीपेक्षा 66 टक्के जास्तीचा पाऊस झाला आहे. सप्टेंबरच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात पाऊस झाल्यास पिकांवर परिणाम होऊन खाद्यपदार्थांची महागाई वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊस