शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"राहुल गांधींकडून 113 वेळा सुरक्षा नियमांचं उल्लंघन", काँग्रेसच्या पत्राला सीआरपीएफचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 13:56 IST

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra : राहुल गांधी यांच्या सुरक्षेसाठी पूर्ण व्यवस्था करण्यात आली. मात्र, अनेक प्रसंगी खुद्द राहुल गांधींनी सुरक्षेच्या सूचनांचे उल्लंघन केल्याचे सीआरपीएफकडून सांगण्यात आले आहे.

नवी दिल्ली : गेल्या 100 हून अधिक दिवसांपासून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. यादरम्यान राहुल गांधी यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच, काँग्रेसने राहुल गांधी यांची सुरक्षा वाढवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्रही लिहिले आहे. दरम्यान, राहुल गांधींच्या सुरक्षेत झालेल्या हलगर्जीपणाबाबत सीआरपीएफचे उत्तर समोर आले आहे. राहुल गांधी यांच्या सुरक्षेसाठी पूर्ण व्यवस्था करण्यात आली. मात्र, अनेक प्रसंगी खुद्द राहुल गांधींनी सुरक्षेच्या सूचनांचे उल्लंघन केल्याचे सीआरपीएफकडून सांगण्यात आले आहे.

सीआरपीएफला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की,  2020  पासून राहुल गांधी यांनी स्वत: 113 वेळा सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले आहे. या विषयी त्यांना वेळोवेळी माहिती देण्यात आली आहे. राहुल गांधीच्या सुरक्षाव्यवस्थेत कोणताही हलगर्जीपणा करण्यात आलेला नाही. राहुल गांधीच्या व्यवस्थेत कोणतीही कमतरता नाही. फक्त सुरक्षा मिळालेल्या व्यक्तीने सुरक्षा नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. दरम्यान राहुल गांधी यात्रेत अनेकदा यात्रेत सुरक्षा कवच तोडून लोकांना भेटण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआरपीएफने म्हटले आहे की, भारत जोडो यात्रेसाठी राहुल गांधीच्या सुरक्षेची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे.  सुरक्षा देण्यात आलेल्य व्यक्तीला सीआरपीएफने दिलेल्या आदेशनुसार राज्य पोलिस, सुरक्षा यंत्रणेशी समन्वय साधत सुरक्षा व्यवस्था देण्यात येते.  गृहमंत्रालयाद्वारे तैनात सुरक्षेसंदर्भात राज्य सरकार आणि राहुल गांधी बरोबरच कॉंग्रेसला देखील माहिती देण्यात आला आहे.

याचबरोबर, सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करून दिल्ली पोलिसांनीही पर्याप्त सुरक्षा कर्मचारी तैनात केले होते. अनेक प्रसंगी खुद्द राहुल गांधी यांनी सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले असून त्यांना वेळोवेळी याबाबत माहिती देण्यात आली आहे, असेही सीआरपीएफने म्हटले आहे. दरम्यान, सूत्रांचे म्हणणे आहे की, सीआरपीएफ हा मुद्दा वेगळ्याप्रकारे समोर आणू शकते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा