शहरं
Join us  
Trending Stories
1
कट, कमिशन व करप्शन ही काँग्रेसची त्रिसूत्री; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
2
पुरीमध्ये भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेत चेंगराचेंगरी; एकाचा मृत्यू, अनेक भाविक जखमी
3
"आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा ठराव विधिमंडळात घ्या अन् लोकसभेत पाठवा, आम्ही पाठिंबा देतो"
4
ZIM vs IND : भारताच्या 'युवा ब्रिगेड'ने पराभवाचा वचपा काढला; झिम्बाब्वेचा मोठ्या फरकाने पराभव केला
5
"माझे नाव इतिहासात नक्कीच लक्षात ठेवले जाईल"; निरोपाच्या भाषणात ऋषी सुनक यांचे विधान
6
महुआ मोईत्रांच्या अडचणीत वाढ! दिल्ली पोलिसांकडून गुन्हा दाखल
7
भाजपच्या काही नेत्यांनी काँग्रेसला मतदान केले, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट
8
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतकरी बांधवांसोबत साधला संवाद
9
कोणती अभिनेत्री नाही पण लवकरच लग्नाची बातमी येईल; 'चॅम्पियन' खेळाडू नव्या इनिंगसाठी सज्ज
10
वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
11
हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी बाबा साकार हरींच्या वकिलाने केला नवा दावा, म्हणाले, ‘’विषारी स्प्रेमुळे…’’
12
"लालूंनी गळ्यात नितीश कुमारांच्या फोटोचं लॉकेट घातलं पाहिजे..."; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला
13
"मी मुख्यमंत्री असताना श्वेतपत्रिकेचे वेगळे अर्थ काढले, त्याचे परिणामही भोगले", पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य
14
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा उद्या शपथविधी
15
सावधान! ९९५ कोटी पासवर्ड हॅक, सेलिब्रिटींचे डिटेल्सही लीक
16
शरद पवारांनी सांगितला रशियन महिलेचा किस्सा, नाव न घेता अजितदादांवर साधला निशाणा
17
ZIM vs IND T20 : छोटा पॅकेट बडा धमाका! अभिषेक शर्माचे 'लै भारी' शतक; षटकारांचा पाऊस
18
"रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आम्ही…’’, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची मोठी भविष्यवाणी  
19
PHOTOS : सूर्या-देविशाच्या लग्नाचा वाढदिवस; जोडप्याने रोमँटिक फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा
20
श्रीलंकेच्या निर्णयाने भारताची चिंता वाढली, 'तो' निर्णय बदलला; आता चीनचा हस्तक्षेप वाढणार...

नोटा बंदीमुळे ८६ टक्के चलन बदलणार - अरुण जेटली

By admin | Published: November 09, 2016 6:10 PM

५०० आणि १ हजारच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे ८६ टक्के चलन बदलले जाणार आहे. कारण ८६ टक्के काळा पैसा...

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ९ - ५०० आणि १ हजारच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे ८६ टक्के चलन बदलले जाणार आहे. कारण ८६ टक्के काळा पैसा ५०० आणि १ हजारच्या नोटांच्या चलनामध्ये होता. हा पैसा दहशतवाद आणि भ्रष्टाचारासाठी वापरला जात होता असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 
 
या निर्णयानंतर प्रामाणिकपणे ज्यांनी पैसा कमावलाय ते बँकेत पैसे जमा करतील. त्यामुळे बँकेत जास्त प्रमाणात पैसा जमा होऊन कर्ज अधिक सहजतेने उपलब्ध होईल. ज्याचा व्याजदर कमी होण्यात परिणाम होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते.  
 
अरुण जेटली यांच्या पत्रकारपरिषदेतील मुद्दे 
 
- उद्यापासून ५०० आणि २ हजारच्या नोटा बँक आणि पोस्ट ऑफीसमध्ये उपलब्ध होतील. पुढच्या दोन ते तीन आठवडयात परिस्थिती सुरळीत होईल. 
 
- काळया पैशाची समांतर अर्थव्यवस्था सुरु होती. ५०० आणि १ हजारची नोट बंद करण्याच्या निर्णयामुळे हा पैसा व्यवस्थेमध्ये येईल.
 
- या निर्णयामुळे निवडणुका स्वस्त झाल्या तर एका चांगली सुरुवात असेल.
 
- नव्या नोटांमध्ये कुठलीही चीप नाही . 
 
- बँकेत नोटा बदलून देण्यासाठी गरजेनुसार अतिरिक्त व्यवस्था केली जाईल.
 
- आरबीआयकडून बँका आणि पोस्ट ऑफीसमध्ये पुरेस चलन उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, अजून दोन ते तीन आठवडयात चलन तुटवडा दूर होईल.  
 
- आर्थिक सुधारणेच्या दृष्टीने हा एक मोठा निर्णय.
 
- डिपॉझिटस वाढल्यामुळे बँकांची क्षमताही वाढणार आहे, हा निर्णय लोकांच्या पैसा खर्च करण्याच्या आणि साठवण्याच्या पद्धतीवर परिणाम करणारा आहे.
 
-  ५०० आणि एक हजारच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचे समाजाने स्वागत केले, भारताची विश्वासहर्ता टिकून रहावी यादृष्टीने हे महत्वाचे पाऊल आहे, देशाला कॅशलेस अर्थव्यस्थेच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी हा निर्णय महत्वाचा आहे.
 
- आमचं सरकार सत्तेवर आल्यापासून अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आम्ही अनेक निर्णय घेतले.