शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

खिचडीत डाळ, पुलावमध्ये भाज्याच; तांदूळ निर्यातबंदीनंतर भाव उच्चांकावर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2023 8:02 AM

भारताच्या बंदीनंतर व्यापाराची घडी विस्कटल्याचा हा परिणाम आहे. 

नवी दिल्ली : भारताने तांदळाच्या निर्यात बंदी केल्यानंतर ऑगस्टमध्ये जागतिक बाजारात तांदळाच्या किमती १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने (एफएओ) शुक्रवारी दिली. संघटनेने अहवालात म्हटले आहे की, जागतिक बाजारात ऑगस्टमध्ये तांदळाच्या किमती ९.८ टक्के वाढल्या. भारताच्या बंदीनंतर व्यापाराची घडी विस्कटल्याचा हा परिणाम आहे. भारताने जुलैमध्ये बिगर-बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. तांदूळ निर्यात बंदी निर्णय जाहीर करताना ग्राहक व्यवहार व अन्न मंत्रालयाने म्हटले होते की, निर्यात बंदीमुळे देशांतर्गत बाजारात पुरेसा तांदूळ उपलब्ध होण्यास मदत होईल तसेच दरवाढीलाही लगाम लागेल.

बंदीमुळे संपूर्ण पुरवठा साखळी विस्कळीत

अहवालात म्हटले आहे की, भारताच्या तांदूळ निर्यात बंदीच्या कालावधीबाबतची अनिश्चितता आणि बंधनांमुळे निर्माण झालेल्या चिंता यामुळे पुरवठा साखळीतील व्यावसायिकांनी साठे रोखून धरले आहेत. काही जण कराराबाबत फेरवाटाघाटी करीत आहेत, तर काहींनी किंमत प्रस्ताव देणे बंद केले आहे. त्यामुळे बाजारातील तांदळाची उपलब्धता घटली आहे. तांदूळ हा जगातील प्रमुख आहार असून त्याच्या किमती अनेक घटकांच्या पार्श्वभूमीवर वाढल्या आहेत. 

अन्न किंमत निर्देशांक मात्र २ वर्षांत नीचांकी पॅरिस : तांदळाच्या किमती घटल्या तरीही ऑगस्टमध्ये एफएओचा जागतिक अन्न निर्देशांक घसरून दोन वर्षांच्या नीचांकावर गेला. जगात सर्वाधिक व्यापार केल्या जाणाऱ्या खाद्यवस्तूंच्या किमतींवर आधारित असलेला जागतिक अन्न निर्देशांक ऑगस्टमध्ये घसरून १२१.४ अंकांवर आला. 

टॅग्स :foodअन्नIndiaभारतMarketबाजार