शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

शाहीनबागच्या मध्यस्थांपुढे आंदोलकांचा बांध फुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 05:48 IST

मध्यस्थांपुढे अश्रुंना वाट मोकळी; सरकारने गैरसमज पसरविल्याची खंत

नवी दिल्ली : ‘सरकारने आम्हालाच दोषी ठरवून देशद्रोही म्हणून संबोधले. त्यामुळे आम्ही संतप्त नाही, तर दुखावलो आहे,’ या शब्दांत शाहीनबागमधील आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यस्थ समितीकडे आपल्या भावना व्यक्त केल्या आणि अश्रुंनाही वाट मोकळी करून दिली. पहिल्या दिवशीच्या चर्चेतून मार्ग न निघाल्याने मध्यस्थ पुन्हा गुरुवारी चर्चा करणार आहेत.

दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू असून प्रथमच त्यांच्याशी चर्चा सुरू झाली. हा तिढा सोडविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ज्येष्ठ अ‍ॅड. संजय हेगडे व अ‍ॅड. साधना रामचंद्रन यांना नेमले आहे. आंदोलकांनी त्यांचे टाळ््यांनी स्वागत केले. आमच्याशी बोलायला कुणी तरी आले आहे. एवढे दिवस आंदोलन करतोय, पण सरकारने आमचे ऐकून घेण्याची तसदी घेतली नाही. आंदोलनाची जागा बदलली तर सरकार आमचे ऐकणार आहे का?, असा सवाल आंदोलकांनी केला. आम्ही सरकारशी चर्चा करू इच्छितो, असे ते म्हणाले. आतापर्यंत दोन लोकांना आम्ही बंदुकीसह पकडून पोलिसांना सोपवले आणि त्पोलिसांनी त्यांना मोकळे सोडले, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. आंदोलन करणे तुमचा अधिकार आहे, पण इतरांचेही मुलभूत अधिकार आहेत. आपले अधिकार वापरताना दुसऱ्यांच्या अधिकारांवर गदा येत असेल तर काय उपयोग?,’ असा सवाल अ‍ॅड. साधना रामचंद्रन यांनी त्यांना केला.‘येथून जाणार नाही’‘एनआरसी व सीएए रद्द केल्याशिवाय आंदोलन संपवणार नाही. गोळ््या झाडल्या तरी इथून जाणार नाही. आम्ही ब्रिटिशांना देशातून बाहेर काढले, तर नरेंद्र मोदी व अमित शहा कोण आहेत?, असे आंदोलक दादी’ म्हणाली. इथे जीव धोक्यात घालून आंदोलन करण्यात आम्हाला आनंद आहे का?,’ असा सवाल एका महिलेने केला. 

टॅग्स :delhiदिल्लीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकagitationआंदोलन