शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

टाकाऊ भाज्यातून तयार केले विविध पदार्थ शून्य कचरा नियोजन: कच्छी जैन मंडळाचा उपक्रम

By admin | Published: September 02, 2015 11:31 PM

सोलापूर : कचर्‍याची समस्या सोडविण्यासाठी टाकाऊ भाजीपाल्यातून अनेक चविष्ट पदार्थ बनविण्याचा र्शी सर्वोदय कच्छी मंडळाने राबविलेल्या उपक्रमाचे आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी कौतुक केले आहे.

सोलापूर : कचर्‍याची समस्या सोडविण्यासाठी टाकाऊ भाजीपाल्यातून अनेक चविष्ट पदार्थ बनविण्याचा र्शी सर्वोदय कच्छी मंडळाने राबविलेल्या उपक्रमाचे आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी कौतुक केले आहे.
स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत र्शी सर्वोदय कच्छी जैन मंडळाने स्मार्ट वॉर्ड तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यानंतर कचर्‍याची समस्या सोडविण्यासाठी शून्य कचरा नियोजन ही संकल्पना मांडली आहे. स्वयंपाक घरात आणलेल्या भाज्यांचा वापर झाल्यानंतर देठे, साली व इतर भाग काढून कचर्‍यात टाकले जातात. पण भाज्यांचे देठ व सालीपासून अनेक चविष्ठ पदार्थ बनविता येतात. असा प्रयोग कच्छी जैन मंडळाचे चंदुभाई देढीया, उषाबेन शहा व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला. याचे प्रात्यक्षिक आयुक्त काळम-पाटील यांना दाखविण्यात आले. भोपळ्याच्या सालीपासून चटणी, कलिंगडाचा पांढरा गर व फ्लॉवरचे पान, केळीच्या सालापासून भाजी व थालीपीठ, पालकाच्या देठापासून पेंडपाला, कोथिंबीरच्या देठापासून मसाला, दोडक्याच्या सालीपासून शिरा व चटणी, पिळलेल्या लिंबाच्या सालीचे लोणचे, डाळिंबाची साल वाळवून औषध, बटाट्याच्या सालीची पावडर असे अनेक रुचकर पदार्थ तयार केले.
बाजारातून आणलेल्या भाज्या निवडल्यानंतर टाकलेले देठ व सालीपासून निम्मा ओला कचरा निर्माण होतो. हा कचरा वेळेत उचलला गेला नाही तर कुजून दुर्गंधी सुटते. त्यामुळे कचर्‍याची समस्या निर्माण होते. पण भाज्या नीट करताना देठ व सालीचे नियोजन केले तर भाज्यांचा खर्च वाचेल याशिवाय कचर्‍याची समस्या निर्माण होणार नाही असे उषाबेन शहा यांनी सांगितले. महिला मंडळे, बचत गट, स्वयंसेवी संस्थाद्वारे ही संकल्पना घरोघरी पोहोचवा असे आदेश महापालिका आयुक्त काळम?पाटील यांनी स्वच्छ भारत मिशनचे समन्वयक दत्तात्रय चौघुले यांना दिले. प्रात्यक्षिक पाहण्यासाठी उपायुक्त र्शीकांत मायकलवार, सहायक आयुक्त प्रदीप साठे, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, आरोग्य अधिकारी डॉ. जयंती आडके आदी उपस्थित होते.