शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

भारतातील रस्ते ठरताहेत पादचाऱ्यांसाठी मृत्युमार्ग, दररोज 56 जणांचा जातो बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 09:05 IST

भारतात रस्ता ओलांडताना होणाऱ्या अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार भारतात दररोज 56 पादचाऱ्यांचा रस्ता ओलांडताना मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली - भारतात रस्ता ओलांडताना होणाऱ्या अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार भारतात दररोज 56 पादचाऱ्यांचा रस्ता ओलांडताना मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारत सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 2014 साली रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 12 हजार 330 होती. 2017 साली हा आकडा वाढून 20 हजार 457 पर्यंत पोहोचला आहे. याची सरासरी काढल्याच दररोज रस्ता ओलांडताना 56 जणांचा मृत्यू होत असल्याचे समोर येते.  भारतात पादचारी हे रस्ता ओलांडत असताना सर्वाधिक असुरक्षित असतात. दुचाकी आणि सायकलस्वारांचाही याच श्रेणीत समावेश होते. अधिकृत आकडेवारीनुसार 2017 मध्ये रस्ते अपघातात दररोज 133 दुचाकीस्वार आणि 10 सायकलस्वार मृत्युमुखी पडले.  राज्यवार आकडेवारी पाहिल्यास गतवर्षी रस्ते अपघातामध्ये पादचाऱ्यांचे सर्वाधिक मृत्यू तामिळनाडूमध्ये झाले. तामिळनाडूमध्ये गतवर्षी रस्ते अपघातात 3 हजार 507 जण मृत्युमुखी पडले. त्याखालोखाल महाराष्ट्रामध्ये 1831 जणांचा मृत्यू झाला. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या आंध्र प्रदेशमध्ये  1331 पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना प्राण गमवावे लागले होते. त्याबरोबरच रस्ते अपघातातील दुचाकीस्वारांच्या मृत्युमध्येही तामिळानाडू पहिल्या स्थानावर आहे. तामिळनाडूमध्ये गतवर्षी झालेल्या रस्ते अपघातात सहा हजार 329 दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. तर उत्तर प्रदेशमध्ये पाच हजार 699 आणि महाराष्ट्रात चार हजार 569 दुचाकीस्वारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.  

टॅग्स :Accidentअपघातnewsबातम्याIndiaभारत