शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

मृत शेतकऱ्याला शहीद घोषित, पार्थिव शरीरावर तिरंगा गुंडाळल्यानं वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 11:26 IST

रामचंद्र यांचा मृतदेह ज्यावेळी गर्दीत ठेवण्यात आला, त्यावेळी एक शेतकरी नेता भाषण देत होता. त्यावेळी, भाषण मध्येच थांबवत रामचंद्र यांना श्रद्धांजली वाहून 1 मिनिटांचे मौन धारण करण्यात आले.

ठळक मुद्देरामचंद्र यांचा मृतदेह ज्यावेळी गर्दीत ठेवण्यात आला, त्यावेळी एक शेतकरी नेता भाषण देत होता. त्यावेळी, भाषण मध्येच थांबवत रामचंद्र यांना श्रद्धांजली वाहून 1 मिनिटांचे मौन धारण करण्यात आले.

चंढीगड - हरियाणातील हिसारमध्ये शेतकऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यात, आता येथील शेतकऱ्यांवर तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप लावला जात आहे. 69 वर्षीय शेतकरी रामचंद्र खरब यांचे ह्रदयविकाराने निधन झाले. मात्र, आंदोलनकर्त्यांनी रुग्णालयात नेण्याऐवजी आंदोलनस्थळावर या शेतकऱ्याला नेले. तेथेच शेतकऱ्याने अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर, या शेतकऱ्याला आंदोलनकर्त्यांनी शहीद दर्जा दिल्याचा आरोप लावण्यात येत आहे. 

रामचंद्र यांचा मृतदेह ज्यावेळी गर्दीत ठेवण्यात आला, त्यावेळी एक शेतकरी नेता भाषण देत होता. त्यावेळी, भाषण मध्येच थांबवत रामचंद्र यांना श्रद्धांजली वाहून 1 मिनिटांचे मौन धारण करण्यात आले. त्यानंतर, मृत शेतकरी रामचंद्र यांना शहीद घोषित करण्यात आले. त्यानंतर, त्यांचे पार्थीव तिरंग्यात लपटण्यात आले. उगलान येथील रहिवाशी असलेल्या रामचंद्र हे कारमधून हिसारसाठी निघाले होते. मात्र, वाटेतच त्यांना श्वास घेताना त्रास होऊ लागला अन् तेथेच त्यांचा मृत्यू झाला. 

रामचंद्र हे भारतीय किसान युनियनचे सदस्य असून 1 आठवड्यापूर्वीच ते दिल्लीच्या टिकरी बॉर्डरवरुन परतले होते. जवळपास 15 दिवस ते दिल्लीच्या आंदोलनस्थळी उपस्थित होते. रामचंद्र यांना 4 मुली आणि 2 मुले आहेत. रामचंद्र यांचा मृतदेह गर्दीत ठेवला असतानाही एकाही व्यक्तीच्या तोंडावर मास्क लावल्याचे दिसून आले नाही. 16 मे रोजी 350 शेतकऱ्यांविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यांविरुद्ध प्रदर्शन करण्यासाठी हे सर्वच शेतकरी एकत्र जमले होते. या आंदोलनकर्त्यांकडून दिल्लीतील शेतकरी आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या जवळपास 400 शेतकऱ्यांना शहीद असल्याचं सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीdelhiदिल्लीHaryanaहरयाणाDeathमृत्यूPoliceपोलिस