शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
2
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
3
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
4
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
6
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
7
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
8
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
9
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
10
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
12
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
13
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
14
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
15
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
16
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
17
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
18
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
19
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
20
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास

सिमीच्या आठ अतिरेक्यांचा खात्मा

By admin | Published: November 01, 2016 5:37 AM

पळून गेलेले सिमीचे (स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट आॅफ इंडिया) आठ अतिरेकी भोपाळलगत इटखेडी भागातील अचारपुरा येथे चकमकीत मारले गेले.

भोपाळ : हेड कॉन्स्टेबलची हत्या केल्यानंतर सोमवारी पहाटे भोपाळच्या मध्यवर्ती कारागृहातून पळून गेलेले सिमीचे (स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट आॅफ इंडिया) आठ अतिरेकी भोपाळलगत इटखेडी भागातील अचारपुरा येथे चकमकीत मारले गेले. दहशतवाद्यांनी कारागृहातून पलायन केल्याचे वृत्त धडकताच खळबळ उडाली होती. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत या प्रकरणी मध्य प्रदेश सरकारला अहवाल मागितला आहे. राज्य सरकारने तडकाफडकी कारवाई करताना कारागृह अधीक्षक अखिलेश तोमर यांच्यासह पाच अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी इटखेडी भागात दहशतवाद्यांचा छडा लावत त्यांना घेरले होते. दहशतवाद्यांनी गोळीबार करीत आव्हान दिल्याने पोलिसांनी गोळीबार केला. चकमकीत आठही अतिरेकी मारले गेल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले. दहशतवादी पळून गेल्याची माहिती मिळताच मध्य प्रदेश सरकारने दहशतवाद्यांना पकडून देण्यासाठी प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. चकमकीनंतर या सर्वांची रेखाचित्रे जारी करण्यात आली आहेत.गेल्या तीन वर्षांत सिमीच्या दहशतवाद्यांनी कारागृहातून पलायन करण्याची ही दुसरी मोठी घटना आहे. २०१३ मध्ये मध्य प्रदेशच्याच खंडवा कारागृहातून सिमीचे सात दहशतवादी पळून गेले होते. केंद्रीय गृहमंत्रालयाने तुरुंग फोडण्याच्या या घटनेबाबत विस्तृत अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. कारागृह प्रशासनाकडून कोणत्या प्रकारचा हलगर्जीपणा झाला काय, हे तपासण्यासह अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कोणती पावले उचलण्यात आली, हे जाणून घेण्याचा त्यामागे उद्देश असल्याचे सूत्रांनी सांगितले. आठ दहशतवाद्यांच्या पलायन प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपविण्यात आला आहे. आठ अतिरेकी चकमकीत मारले गेल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी पत्रकारांना त्याबाबत माहिती दिली. मी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांना दूरध्वनीवर माहिती दिली आहे. अतिरेक्यांचे तार देशातच नव्हे तर विदेशातही जुळलेले असावेत. त्यामुळे हे प्रकरण केवळ मध्य प्रदेशचे राहिले नाही. एनआयएकडे तपास सोपविल्याने या घटनेमागचे तथ्य उघड होईल, असे त्यांनी नमूद केले. या घटनेचे गांभीर्य पाहता राज्य सरकारने माजी पोलीस महासंचालक नंदन दुबे यांच्याकडून तपास करण्याचा निर्णय घेतला आहे. दोषी अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याचे पाऊलही उचलले जाऊ शकते, असे ते म्हणाले. चौहान यांनी स्वत: सक्रिय होत संपूर्ण घटनाक्रमाची माहिती घेतली. पाच अधिकाऱ्यांना निलंबित करतानाच चौहान यांनी अतिरिक्त कारागृह अधीक्षकांची पोलीस मुख्यालयी तडकाफडकी बदली केली. (प्रतिनिधी)>दहशतवाद्यांवर देशद्रोहाच्या गुन्ह्याची नोंदचकमकीत मारल्या गेलेल्या आठ दहशतवाद्यांपैकी पाच जण काही वर्षांपूर्वी खंडवा कारागृहातून फरार झाले होते. अकील, जाकीर, मेहबूब, अमजद आणि मोहम्मद सादिक अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या घडामोडीचे केंद्र खंडवा होते. या सर्वांनी ३० सप्टेंबर २०१३ रोजी खंडवा कारागृहातून पलायन केले होते. या दहशतवाद्यांवर खंडवा येथे एटीएस जवान सीताराम आणि दोन लोकांची हत्या तसेच रतलाम येथे एटीएस जवानाची हत्या, देशद्रोह, बँकेत दरोडा, लूटमार यासारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद होती. त्यांच्यावर खंडवासह विविध न्यायालयात गंभीर प्रकरणे दाखल आहेत. खंडवा कारागृहात सिमी आणि इंडियन मुजाहिद्दीनचे नऊ सदस्य होते. त्यापैकी सहा फरार झाले होते. त्यानंतर त्यांना पकडण्यात आले. >पहाडामागे दडले होते अतिरेकी...अतिरेकी गुनगा पोलीसठाण्यांतर्गत अचारपुरा जंगलालगत खेजडा गावी पहाडावर दडून बसले होते. अतिरेक्यांना शरण येण्यास सांगितल्यानंतर त्यांनी गोळीबार केला. पोलिसांवर दगडफेकही केली, असे पोलीस महानिरीक्षक योगेश चौधरी यांनी सांगितले. अतिरेकी पळून गेल्यानंतर नऊ तासानंतर ही चकमक झाली. भोपाळ पोलीस, गुन्हे शाखा आणि एसटीएफचे ११ जवान या मोहिमेत सहभागी होते, असे ते म्हणाले. इंदूरहून गृहमंत्रालयाला मिळालेल्या गुप्तचर अहवालात सिमीचे अतिरेकी पळून जाण्याची शक्यता वर्तविली होती, अशी माहिती अनधिकृत सूत्रांनी दिली आहे.>सिमीच्या संशयित अतिरेक्यांनी कसे केले ‘जेल ब्रेक’!घटनेची वेळ : सोमवारी पहाटे २ ते ३ वाजेदरम्यान बी ब्लॉकमध्ये असलेले सिमीचे आठ संशयित अतिरेकी फरार झाले.अतिरेक्यांनी आधी बरॅक तोडले. त्यानंतर स्टीलच्या धारदार प्लेटने हेड कॉन्स्टेबल रमाशंकर यांची गळा कापून हत्या करण्यात आली. दुसरा सुरक्षारक्षक चंदन याला बांधून ठेवले.सर्व अतिरेकी कारागृहाच्या भिंतीपर्यंत पोहोचले. बेडशीट एकमेकांना बांधून सर्वांनी कारागृहाची भिंत चढून पोबारा केला. सुरक्षा रक्षकांच्या ड्युटी अदलाबदलीदरम्यान अतिरेक्यांनी ‘जेल ब्रेक’ केले.